भूसंपानाची प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण होणार…
औरंगाबाद-नगर-पुणे महामार्गात जमिनी भुसंपादित शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या चार पट अधिक मोबदला मिळणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. जर रेडी रेकनरचा दर जर पाच लाख रुपये असेल तर भुसंपादित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या मोबदल्यात एकरी 20 लाख रुपय मिळणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून या महामार्गासाठी आवश्यक जिल्ह्यातील भूसंपादनाचे काम सुरू होणार असून भूसंपादन नियमात राहून केला जाणार आहे. शिवाय, औरंगाबाद जिल्ह्यात भूसंपादनासाठी कृष्णा खोऱ्याचे भूसंपादन अधिकारी राजेश जोशी यांची अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
या महामार्गासाठीचे औरंगाबाद जिल्ह्याचे राजपत्रक नुकताच प्रसिद्ध झाल आहे. औरंगाबाद तालुक्यातील सात आणि पैठण तालुक्यातील 17 अशा एकूण 24 गावांची नावे सदर राजपत्रकात नमूद झाली होती. निश्चितच भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असल्याने लवकरच या प्रक्रियेला सुरवात होणार आहे.
२४ गावांतून जाणार रस्ता
औरंगाबाद ते पुणे या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) निघाली असून औरंगाबाद तालुक्यातील ७ तर पैठण तालुक्यातील १७ गावांतून मार्ग जाणार आहे. भारतमाला टप्पा-२ मध्ये ग्रीनफिल्डमध्ये हा मार्ग प्रस्तावित आहे. औरंगाबाद तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रूक, चिंचोली, घारदोन तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रूक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून रस्ता जाणार आहे.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…