महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 वाहनांच्या भिषण अपघातात पिता-पुत्राला मृत्यूने गाठल…

औरंगाबाद: पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील मंगळवारी सायंकाळी नक्षत्रवाडी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन हायवा, एक मोटारसायकल आणि कार अशा चार वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून पैठण येथील शिक्षक संजय सुखदेव दहिफळे आणि त्यांचा 13 वर्षीय मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी कौशल्या दहिफळे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

चार वाहनांमध्ये झालेल्या या विचित्र अपघातात मोटार सायकल दोन वाहनांच्यामध्ये आली होती. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमी कौशल्या दहिफळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दहिफळे हे दांपत्य सासरवाडीला जात असताना हा काळाने त्यांच्यावर घाला घातला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कसा झाला अपघात?

सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास हे कुटुंब नक्षत्रवाडी परिसरातून दुचाकीवरून जात होते. एवढ्यात सुसाट वेगाने जाणाऱ्या हायवाने त्यांना उडवले. यात संजय यांची दुचाकी समोर असलेल्या दुसऱ्या हायवाला घडकली. ही धडक एवढ्या वेगाने होती की दुचाकी हायवाच्या चाकाखाली गेली. संजय आणि त्यांचा मुलगा समर्थ हे चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. तर कौशल्या लांब फेकल्या गेल्या.

हायवाने आधी कारला धडक दिली…

निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुनसार, सदर हायवाने दुचाकीला धडक देण्यााघी महिला चालवत असलेल्या कारलाही धडक दिली. त्यामुळे त्याने खूप वेगाने विरुद्ध दिशेला हायवा वळवला. त्यातच संतोष यांची दुचाकी चाकाखाली गेली. त्यानंतर हाच हायवा समोरील हायवाला जाऊन धडकला.

परिसरात हळहळ

पैठण रोडवर वेगाने जाणाऱ्या हायवांमुळे दैनंदिन प्रवास करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश हायवांचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असतो. त्यातच वळणा-वळणाचा हा रस्ता असल्याने अपघातांच्या घटना वारंवार घडतात. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवांमुळे शिक्षकाचं अख्खं कुटुंबच संपवल्याची ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

10 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

17 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

17 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

17 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

17 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

18 तास ago