महाराष्ट्र

खिलारी बैलांचा मृत्यू झाल्याचे पाहून मालक ढसाढसा रडला…

कोल्हापूर : एक शेतकरी मशागतीची कामे आवरून बैलगाडीने घराकडे चालले असताना कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरल्याने बैलगाडी कालव्यात पडली. या घटनेत दोन्ही खिल्लारी बैलांचा मृत्यू झाला आहे. बैलांकडे पाहून मालक ढसाढसा रडल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

कागल तालुक्यातील वाळवे खुर्द येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कालव्यात पडून शेतकरी दिलीप खुटाळे यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. दिलीप खुटाळे हे शेतातील मशागतीची कामे आवरून बैलगाडीने घराकडे चालले होते. कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरल्याने दिलीप खुटाळे यांच्यासह बैलगाडी कालव्यात पडली. बैलांच्या गळ्यात बैलगाडीचे जू असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता आली नाही. त्यामुळे पाण्यात बूडून दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे.

दिलीप खुटाळे हे स्वतः वाचले पण आपल्या या लाडक्या खिल्लारी जोडीला वाचवू शकले नाही. कालव्यातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांना बोलावून बैलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, कालव्यात गुदमरून बैलांचा मृत्यू झाला होता. दोन्हीही खिल्लारी बैलांचा मृत्यू झाल्यामुळे दिलीप खुटाळे यांना घटनास्थळावरच रडू कोसळले.

या दोन्ही बैलांच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे खुटाळे या गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे गावकरीही हळहळले होते. या गरिब शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई देवून शेतकऱ्याला हातभार लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Video: नवा खिलारी बैल सापडला मगरींच्या तावडीत; चार तास थरार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

5 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

5 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

18 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 दिवस ago