महाराष्ट्र

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित चित्रपट; रुपाली चाकणकरांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या यांच्या भूमिकेत अभिनेत्री दिसणार आहेत. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना त्यावर आधारित चित्रपट तयार केला जात आहे. तसेच एखाद्या व्यक्तीचे पात्र साकारताना संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक असते, मात्र या चित्रपटासाठी माझी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांविरोधातही कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खरात प्रकरणात आपल्यावर आणि आपल्या कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “माझ्या मुलांनाही लक्ष्य करण्यात आले. ते शैक्षणिक क्षेत्रात असतानाही त्यांच्याविरोधातही निराधार आरोप करण्यात आले,” असे त्या म्हणाल्या.

यासंदर्भात त्यांनी यांना नोटीस पाठविल्याचे सांगितले. तसेच येथे दाखल केलेल्या याचिकेत , , आणि आशा मिरगे यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १० जुलै रोजी त्या स्वतः दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहणार असून, काही यूट्यूब चॅनेल्सविरोधातही न्यायालयीन कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता त्याच प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चंद्रपूरमध्ये उच्च शिक्षण विभागाचे संयुक्त संचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव

मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना उच्च शिक्षणाशी संबंधित कामांसाठी नागपूरला जावे लागू नये, यासाठी…

1 तास ago

आधुनिक शिक्षण क्रांतीशिवाय ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार होणार नाही

मुंबई: भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना सर्वाधिक परिवर्तनाची अपेक्षा ज्या क्षेत्राकडून आहे,…

1 तास ago

केंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे; राज्याने केंद्राशी समन्वय साधावा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या…

1 तास ago

लोकशाही वाचवा निर्धार सभा; नागरिकत्व आणि लोकशाही धोक्यात असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित "लोकशाही वाचवा निर्धार सभा"…

1 तास ago

महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ऐतिहासिक; महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-२०२६’ हे केवळ कायदा नसून मातीत जीव ओतणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला,…

1 तास ago

राज्यात ५,०१२ सहायक प्राध्यापक पदभरतीला वेग; रोस्टर पूर्ण होताच महाविद्यालयांना एनओसी; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील ५,०१२ सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला शासनाने…

1 तास ago