अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा झालेल्या गँगवॉरमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. स्थानिकांकडून गोळीबार झाल्याचाही दावा करण्यात येत असून, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णवाद नगर परिसरातील चौकात शुभम यादव (वय १९) हा जात असताना दोन ते तीन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर कोयते आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. गंभीर जखमी झालेला शुभम घटनास्थळीच कोसळला.
भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेवेळी अनेक नागरिक उपस्थित होते, मात्र कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी शुभम यादव याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना उच्च शिक्षणाशी संबंधित कामांसाठी नागपूरला जावे लागू नये, यासाठी…
मुंबई: भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना सर्वाधिक परिवर्तनाची अपेक्षा ज्या क्षेत्राकडून आहे,…
मुंबई: राज्यातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित "लोकशाही वाचवा निर्धार सभा"…
मुंबई: ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-२०२६’ हे केवळ कायदा नसून मातीत जीव ओतणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला,…
मुंबई : राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील ५,०१२ सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला शासनाने…