महाराष्ट्र

संजय गांधी ते अजित पवार! विमान अपघातांत संपणारी राजकीय कारकीर्द

विमान अपघातांत मृत्यू झालेल्या नेत्यांची भयावह मालिका

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. धावपट्टीवर उतरत असतानाच विमान कोसळून भीषण स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक, सहवैमानिक, अंगरक्षक आणि फ्लाइट अटेंडंट यांचा मृत्यू झाला.

विमान अपघातात राजकीय नेत्यांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी संजय गांधी (१९८०), माधवराव शिंदे (२००१), वाय. एस. राजशेखर रेड्डी (२००९), गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी (२०२५) यांचाही विमान अथवा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. प्रत्येक वेळी देशभरातून शोक व्यक्त झाला, मात्र अशा दुर्घटनांची मालिका थांबलेली नाही.

अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी “परत या अजितदादा” असा आक्रोश उपस्थित हजारो नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रू बनून वाहत होता. मात्र नियतीपुढे कोणाचाच निभाव लागत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २९ वर्षीय फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हिच्या मृत्यूकडे मात्र फारसे लक्ष दिले गेले नाही. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण सर्वच वृत्तवाहिन्यांवर सुरू असताना, पिंकीच्या कुटुंबीयांशी विमान कंपनी किंवा प्रशासनाकडून संपर्क साधला नसल्याने तिच्या वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राजकीय नेत्यांकडून खाजगी विमाने, हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड फ्लाइट्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वेळेची बचत, गोपनीयता आणि सोयीसाठी हा पर्याय निवडला जात असला, तरी देखभाल, तांत्रिक तपासणी, हवामानाचा अंदाज, वैमानिकांचा अनुभव आणि नागरी विमान सेवा संचालनालयाची परवानगी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बारामतीत कोसळलेले विमान हे व्हीआरएस एव्हिएशन या खाजगी कंपनीचे असून, याच विमानाला २०२३ मध्ये मुंबई विमानतळावर उतरताना अपघात झाला होता. त्यावेळी सर्व प्रवासी बचावले होते, मात्र यंदाच्या दुर्घटनेने गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.

देशात यापूर्वीही अनेक दिग्गज नेत्यांचे हेलिकॉप्टर किंवा विमाने कोसळून मृत्यू झाले आहेत. लोकसभा माजी अध्यक्ष जी.एम.सी. बालयोगी, उद्योगपती ओ. पी. जिंदाल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खंडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांसारख्या अनेकांची नावे या यादीत आहेत.

दरम्यान, काही ज्योतिषांनी याआधीच डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या कालावधीत प्रमुख राजकीय व्यक्तींसाठी प्रतिकूल काळ असल्याचे भाकीत केल्याचेही चर्चेत आले आहे. मात्र अपघात ही नियतीची खेळी की मानवी निष्काळजीपणा, याचे उत्तर शोधणे आता अधिक गरजेचे बनले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

3 मिनिटे ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

8 मिनिटे ago

NEET 2026 मध्ये बारामतीची श्रावणी देशात अव्वल; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा व्हिडिओ कॉलवरून गौरव

मुंबई: नीट (NEET) २०२६ परीक्षेत बारामतीच्या कुमारी श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने ७२० पैकी ७१० गुण…

11 मिनिटे ago

मतांसाठी ‘लाडकी बहीण’, सत्तेनंतर ‘अपात्र’; सरकारने महिलांचा विश्वासघात केल्याचा काँग्रेसचा आरोप

'लाडकी बहीण' योजनेत लाखो महिलांना अपात्र ठरवणे, ई-केवायसीमुळे लाभ रोखणे आणि ₹२,१०० चे आश्वासन पूर्ण…

14 मिनिटे ago

शिरुर! पाठीवर वडाचे झाड घेऊन पंढरपूरची पायवारी; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात युवकाचा अनोखा एल्गार

शिरुर (तेजस फडके): एकीकडे शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण मोहिमा राबविल्या जातात, पर्यावरण संवर्धनाचे…

19 मिनिटे ago

न्हावरे येथे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण; पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…

6 तास ago