महाराष्ट्र

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरात होणार मोठी कपात

संभाजीनगर: राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता ग्राहकांना महागड्या वीजबिलांपासून मोठा दिलासा मिळणार असून, लवकरच वीज दरात कपात होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)ने वीज दर कपात करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) सकारात्मक निर्णय दिला आहे.

किती कपात होणार

पहिल्या वर्षी: वीज दरात थेट 10% कपात

पुढील 5 वर्षांत: टप्प्याटप्प्याने मिळणार एकूण 26% दर कपात

फडणवीस यांनी काय म्हटल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दर कमी करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आणि MERC ने ती मान्य करत ऐतिहासिक निर्णय दिला. पूर्वी वीजदर वाढीच्या याचिका सादर केल्या जात असत, मात्र यावेळी महावितरणने जनतेच्या हितासाठी दर कपातीसाठी पुढाकार घेतला.

कोणाला होणार सर्वाधिक फायदा  

घरगुती ग्राहक

औद्योगिक ग्राहक

व्यावसायिक ग्राहक

राज्यातील ७०% ग्राहक १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात.

या ग्राहकांसाठी दर कमी होण्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

दर कपात कशामुळे शक्य झाली

फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 युद्धपातळीवर राबवली जात असून, त्यात दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा देण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर हरितऊर्जेवर लक्ष केंद्रित करून वीज खरेदी खर्चात मोठी बचत करण्यात येत आहे. याच बचतीमुळे वीज दर कपात करणे शक्य झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तिरंग्याच्या प्रेमामागे भाजपा-आरएसएसचा कावा नसावा’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता…

10 तास ago

आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला सचिन अहिरांची सदिच्छा भेट; आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला…

15 तास ago

लाल किल्ल्यावरून मोदींचा ‘वंदे मातरम्’चा जयघोष; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना थेट सल्ला

मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच…

15 तास ago

संसद परिसरात प्रियंका गांधी आणि भाजप खासदार आमनेसामने;

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…

18 तास ago

‘अंधारे आल्या अन् शिवसेनेचं अस्तित्वच संपलं’; भाजप आमदारांचा हल्लाबोल, ‘नैराश्यातून बडबड सुरू’

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…

18 तास ago

अण्णासाहेब पाटील महामंडळात मोठा फेरबदल; नरेंद्र पाटलांच्या मागणीला यश, एमडी विजयसिंह देशमुखांची बदली

मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…

18 तास ago