संभाजीनगर: राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता ग्राहकांना महागड्या वीजबिलांपासून मोठा दिलासा मिळणार असून, लवकरच वीज दरात कपात होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)ने वीज दर कपात करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) सकारात्मक निर्णय दिला आहे.
किती कपात होणार
पहिल्या वर्षी: वीज दरात थेट 10% कपात
पुढील 5 वर्षांत: टप्प्याटप्प्याने मिळणार एकूण 26% दर कपात
फडणवीस यांनी काय म्हटल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दर कमी करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आणि MERC ने ती मान्य करत ऐतिहासिक निर्णय दिला. पूर्वी वीजदर वाढीच्या याचिका सादर केल्या जात असत, मात्र यावेळी महावितरणने जनतेच्या हितासाठी दर कपातीसाठी पुढाकार घेतला.
कोणाला होणार सर्वाधिक फायदा
घरगुती ग्राहक
औद्योगिक ग्राहक
व्यावसायिक ग्राहक
राज्यातील ७०% ग्राहक १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात.
या ग्राहकांसाठी दर कमी होण्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
दर कपात कशामुळे शक्य झाली
फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 युद्धपातळीवर राबवली जात असून, त्यात दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा देण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर हरितऊर्जेवर लक्ष केंद्रित करून वीज खरेदी खर्चात मोठी बचत करण्यात येत आहे. याच बचतीमुळे वीज दर कपात करणे शक्य झाले आहे.
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…