महाराष्ट्र

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरात होणार मोठी कपात

संभाजीनगर: राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता ग्राहकांना महागड्या वीजबिलांपासून मोठा दिलासा मिळणार असून, लवकरच वीज दरात कपात होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)ने वीज दर कपात करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) सकारात्मक निर्णय दिला आहे.

किती कपात होणार

पहिल्या वर्षी: वीज दरात थेट 10% कपात

पुढील 5 वर्षांत: टप्प्याटप्प्याने मिळणार एकूण 26% दर कपात

फडणवीस यांनी काय म्हटल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दर कमी करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आणि MERC ने ती मान्य करत ऐतिहासिक निर्णय दिला. पूर्वी वीजदर वाढीच्या याचिका सादर केल्या जात असत, मात्र यावेळी महावितरणने जनतेच्या हितासाठी दर कपातीसाठी पुढाकार घेतला.

कोणाला होणार सर्वाधिक फायदा  

घरगुती ग्राहक

औद्योगिक ग्राहक

व्यावसायिक ग्राहक

राज्यातील ७०% ग्राहक १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात.

या ग्राहकांसाठी दर कमी होण्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

दर कपात कशामुळे शक्य झाली

फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 युद्धपातळीवर राबवली जात असून, त्यात दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा देण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर हरितऊर्जेवर लक्ष केंद्रित करून वीज खरेदी खर्चात मोठी बचत करण्यात येत आहे. याच बचतीमुळे वीज दर कपात करणे शक्य झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

30 मिनिटे ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

35 मिनिटे ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

50 मिनिटे ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

57 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

59 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago