नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी संसद भवन परिसरात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि भाजप खासदार मुकेश दलाल आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले.
प्रियंका गांधी संसद भवनाकडे जात असताना भाजप खासदार मुकेश दलाल यांनी ‘राहुल गांधी शर्म करो, शर्म करो’ अशा घोषणा दिल्या. त्यांच्या हातात झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करणारे पोस्टर होते. ‘झारखंडमध्ये विद्यार्थ्यांसोबत झालेल्या कथित निर्दयतेवर राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे’, अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली.यावेळी प्रियंका गांधी यांनी मुकेश दलाल यांना राहुल गांधी झारखंडमधील विद्यार्थ्यांना भेटल्याचे सांगितले. त्यावर त्या पुढे निघून गेल्या. मात्र, मुकेश दलाल यांनी राहुल गांधी यांच्या झारखंड दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘राहुल गांधी झारखंडला कधी गेले?’
मुकेश दलाल म्हणाले, “राहुल गांधी यांनी झारखंडचा दौरा कधी केला? राहुल गांधी आणि केजरीवाल झारखंडला जाण्याची हिंमत का दाखवत नाहीत? प्रियंका गांधी यांनी मला सांगितले की राहुल गांधी यावर काम करत आहेत. त्यामुळे मी त्यांना विचारले की राहुल गांधी अजून झारखंडला का गेले नाहीत?”
दरम्यान, संसद परिसरातील हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. दिल्लीतील Gen Z आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज आणि राम मंदिरातील दान चोरीच्या कथित प्रकरणावरून विरोधक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उत्तराची मागणी करत आहेत. सभागृहात गोंधळ सुरू असल्याने कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे.सरकारच्या बाजूने अमित शाह सभागृहात उत्तर देण्यास तयार असल्याचे सोमवारी सांगण्यात आले. मात्र, त्यासाठी विरोधकांनी चर्चेत सहभागी होऊन सरकारचे उत्तर ऐकावे, अशी भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली आहे.
‘विरोधी पक्ष यावर गप्प का?’
दरम्यान, भाजपने आता झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनातील कथित लाठीचार्जच्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरण्यास सुरुवात केली आहे. “या मुद्द्यावर विरोधी पक्ष गप्प का?” असा सवाल भाजप नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या मुद्द्यावरून एनडीएच्या खासदारांनी मंगळवारी संसद परिसरात मार्च काढला. या मार्चवर प्रतिक्रिया देताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “मी पहिल्यांदाच सरकारच्या खासदारांना प्रदर्शन करताना पाहत आहे.”“आम्ही यांना मजबूर केलं आहे. आता यांनी सभागृहात येऊन उत्तर द्यावं,” असा टोलाही प्रियंका गांधी यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला.त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यातही सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८…
मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक…
आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चालली आहे. प्रत्येक आजारासाठी अलोपॅथीच्या महागात महाग गोळ्या बनवल्या जात…
व्हिटॅमिन बी-१२ हे 'सायनोकोबालामिन' म्हणून ओळखले जाते. हे पेशी पर्यंतचे चयापचय, विशेषतः DNA संश्लेषण (अनुवंशिक…