महाराष्ट्र

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा अधिकार असून, राज्य सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील काही तरतुदी या मूळ कायद्याशी विसंगत आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या तरतुदी तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

सपकाळ यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सामान्य प्रशासन विभागाने १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्राद्वारे माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपील, द्वितीय अपील आणि माहिती पुरवण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. या शुल्कवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना माहितीचा अधिकार वापरणे आर्थिकदृष्ट्या कठीण होणार असून, कायद्याचा मूळ उद्देशच बाधित होईल.

त्यांनी निदर्शनास आणून दिले की, केंद्र सरकार आजही माहिती अधिकार अर्जासाठी केवळ १० रुपये शुल्क आकारते आणि अपिलांसाठी कोणतेही शुल्क घेत नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारने अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्यामागील कारणे स्पष्ट केलेली नाहीत. माहिती अधिकार अधिनियमातील कलम ४(१)(क) आणि ४(१)(ड) नुसार अशा निर्णयामागील कारणे, अभ्यास, आर्थिक विश्लेषण आणि वस्तुनिष्ठ माहिती स्वतःहून जाहीर करणे बंधनकारक असतानाही तसे करण्यात आलेले नाही.

राजपत्रातील कलम ११(ग) चा उल्लेख करत सपकाळ यांनी म्हटले आहे की, अनिवार्य माहिती प्रसिद्ध करण्यात कसूर झाल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या प्रकरणात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

याशिवाय, माहिती अधिकार अर्जाच्या नमुन्यात अर्जदाराला माहिती मागण्याचे “प्रयोजन” नमूद करण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही अट माहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ६(२) शी स्पष्टपणे विसंगत असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. या कलमानुसार माहिती मागणाऱ्या व्यक्तीला माहिती का हवी आहे, याचे कारण देणे आवश्यक नसते.

काँग्रेसने सरकारकडे राजपत्रातील वादग्रस्त तरतुदी तात्काळ रद्द करण्याची, “प्रयोजन” नमूद करण्याची अट काढून टाकण्यासाठी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्याची, तसेच शुल्कवाढीमागील सर्व कारणे व अभ्यास अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तसेच, माहिती अधिकारांतर्गत स्वतःहून माहिती जाहीर न करणाऱ्या विभागप्रमुखांवर आतापर्यंत किती कारवाई करण्यात आली, याची माहितीही देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

9 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

9 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

12 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

13 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

13 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

13 तास ago