महाराष्ट्र

शिंदेंचा ‘षटकार’; ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेत दाखल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हा प्रवेश बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय असल्याचे सांगितले. “२०२२ मध्ये ४० आमदारांसह सुरू झालेल्या लढ्याचा हा दुसरा टप्पा आहे. आता एक नाही तर सहा टायगर आमच्यासोबत आले आहेत. चौकार नाही, षटकार मारला आहे,” असे ते म्हणाले.

शिंदे यांनी सांगितले की, बाळासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा असलेले शिवसैनिक अखेर शिवसेनेतच एकवटतात. विकास, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि जनतेची कामे या उद्देशानेच या खासदारांनी पक्षात प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला.

प्रवेश केलेल्या खासदारांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना शिंदे यांनी संजय बंडू जाधव यांना जमिनीशी नाळ जोडून काम करणारे नेते, संजय दिना पाटील यांना सामान्य माणसांचा कैवारी, तर ओमराजे निंबाळकर यांना “रिअल स्टार” असे संबोधले. भाऊसाहेब वाकचौरे यांचेही त्यांनी विशेष स्वागत केले.

२०२२ च्या बंडानंतर आपल्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना शिंदे म्हणाले की, त्या वेळी अनेकांनी एकही आमदार निवडून येणार नसल्याचा दावा केला होता. मात्र जनतेने त्यांचा निर्णय स्वीकारला आणि मोठ्या संख्येने आमदार निवडून दिले. राज्यातील विकासकामे, लाडकी बहीण योजना आणि शेतकरी हिताच्या योजनांमुळे शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.

“दिलेला शब्द पाळणे हीच आमची ताकद आहे. नव्याने पक्षात आलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामे आणि प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील,” अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून विकासकामांना आणखी गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट करत नाही. आज सहाही खासदार शिवसेनेत सामील झाले असून ऑपरेशन टायगर पूर्णपणे यशस्वी झाले आहे.”

या कार्यक्रमाला शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदार आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. सहा खासदारांच्या प्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा…

7 तास ago

ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यास राज्यभर आंदोलन; विजय वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे…

7 तास ago

देशाचे पहिले शक्तीपीठ मोदी, दुसरे शक्तीपीठ अमित शाह; एकनाथ शिंदे

इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे…

7 तास ago

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात उच्च न्यायालयात अपील; अमित शाह यांचे सीबीआयला निर्देश; एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून…

7 तास ago

अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ; कोल्हापुरात ‘विकासाची पंचगंगा’ वाहणार; एकनाथ शिंदे

कोल्हापूर: श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय…

7 तास ago

जनादेशाचा बाजार, संविधानावर घाव; पक्षफोडीच्या राजकारणावर काँग्रेसची टीका

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी जनादेशाची पायमल्ली, पक्षफोडीचे…

7 तास ago