महाराष्ट्र

ग्रामसभा आणि तुमचे अधिकार! गावाच्या विकासाची खरी किल्ली

औरंगाबाद: गावाचा विकास म्हणजे केवळ सिमेंटचे रस्ते, इमारती किंवा योजना नव्हते

तर गावातील प्रत्येक नागरिकाचा निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग म्हणजेच खरा विकास होय

याच लोकशाही सहभागाचे सर्वात प्रभावी व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा.

इथेच नागरिक थेट ग्रामपंचायतीला प्रश्न विचारू शकतात, सूचना देऊ शकतात आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

ग्रामसभेत नागरिकांना मिळणारे ७ महत्त्वाचे अधिकार

निर्णय घेण्याचा अधिकार

गावात कोणती कामे प्राधान्याने करायची – रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य – याचा अंतिम निर्णय ग्रामसभेत घेतला जातो.

हिशोब तपासणीचा अधिकार

ग्रामपंचायतीला मिळालेला निधी किती आहे आणि तो कुठे खर्च झाला, याचा संपूर्ण लेखाजोखा पाहण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.

दप्तर तपासणीचा अधिकार

मस्टर रोल, कॅशबुक, मागील ग्रामसभांचे इतिवृत्त यांची तपासणी करण्याची मागणी ग्रामसभेत करता येते.

लाभार्थी निवडीचा अधिकार

घरकुल, पेन्शन, शेती व इतर शासकीय योजनांचे लाभार्थी ग्रामसभेतच निवडले गेले पाहिजेत.

महिला सभेचा अधिकार

मुख्य ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिला सभा घेणे बंधनकारक आहे.

महिलांनी मांडलेले पाणी, स्वच्छता व आरोग्य विषयक प्रश्न मुख्य ग्रामसभेत मांडणे आवश्यक आहे.

सामाजिक अंकेक्षणाचा अधिकार

मनरेगा व इतर विकासकामांची गुणवत्ता, खर्च व अंमलबजावणीची प्रत्यक्ष तपासणी ग्रामसभा करू शकते.

प्रशासनाला जाब विचारण्याचा अधिकार

कामे निकृष्ट असतील किंवा रखडली असतील, तर सरपंच व ग्रामसेवकांना थेट जाब विचारण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.

 

गणसंख्या

एकूण मतदारांच्या किमान १५ टक्के किंवा १०० नागरिकांची उपस्थिती आवश्यक असते.

ग्रामसभा कधी होते

वर्षातून किमान ४ ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.

साधारणपणे

२६ जानेवारी

१ मे

१५ ऑगस्ट

२ ऑक्टोबर

ठराव

ग्रामसभेत बहुमताने मंजूर झालेला ठराव ग्रामपंचायतीवर बंधनकारक असतो.

ग्रामसभेत सहभागी का व्हावे

भ्रष्टाचार रोखण्यासाठी

प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी

आपल्या वॉर्डातील समस्या मांडण्यासाठी

गाव आत्मनिर्भर व प्रगत बनवण्यासाठी

जेव्हा नागरिक जागरूक होतो, तेव्हाच गाव आदर्श बनते

पुढच्या ग्रामसभेला नक्की उपस्थित रहा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

1 तास ago

लता म्हणजे आयुष्याची वेल, आशा म्हणजे जगण्याची उमेद; एकनाथ शिंदे

  पुणे: “Lata Mangeshkar म्हणजे आयुष्याची कोमल वेल, तर Asha Bhosle म्हणजे त्या वेलीला मिळालेली…

1 तास ago

हाय कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा झटका वेळीच येण्यापासून रोखणारी कारणे

1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर…

1 तास ago

मूठभर कांद्याच्या टरफलांनी करा नॅचरल हेअर कलर, पांढरे केसही होतील १५ मिनिटांत काळेभोर

केसांच्या अनेक समस्यांमध्ये केसगळती व केस अकाली पांढरे होणे या दोन समस्या फारच कॉमन आहेत.…

1 तास ago

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नाश्त्यात खा ‘हे’ पदार्थ, शुगर वाढणार नाही

डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची…

2 तास ago