महाराष्ट्र

दादांच्या जाण्याने आजीचे अश्रू थांबत नाहीत, शरद पवारही अस्वस्थ; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट

एक महिना पूर्ण: अजित पवारांच्या आठवणीत युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. त्यांच्या जाण्याने राज्यभरात शोककळा पसरली होती. आजही त्यांच्या आठवणीने कुटुंबीय आणि समर्थक भावूक होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे आणि श्रीनिवास पवार यांचे सुपूत्र युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला… माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एक महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरला,” असे त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात, “आजही तुमच्या नसण्याची जाणीव होत नाही. तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, ‘मी कामाचा माणूस आहे, आणि हे काम असंच झालं पाहिजे!’ असा भास होतो. सतत वाटतं, आता तुमची गाठ पडेल… पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जातं. आता मी तुमचे मार्गदर्शन कसे घेऊ?”

युगेंद्र पवार यांनी कुटुंबातील भावनिक अवस्थेचाही उल्लेख केला. “आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. बाबा इतके भावूक झाले आहेत की त्यांचा बांध केव्हाही फुटतो. ‘दादा असा कसा जाऊ शकतो? अजून बरंच काही बोलायचं होतं…’ असे म्हणत ते व्यथित झाले,” असे त्यांनी नमूद केले.

अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कार्यशैलीची आणि ठाम नेतृत्वाची आठवण अनेकजण काढत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

12 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

14 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

19 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

19 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

19 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

19 तास ago