महाराष्ट्र

मी मामाच्या पुढे कधीही जाणार नाही: आमदार सत्यजित तांबे

राजकारणापेक्षा नात्याचा सन्मान महत्त्वाचा 

संगमनेर: माझ्यात आणि मामांमध्ये कुठेही दुरावा नाही. मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही, जाणारही नाही. हे माझे आयुष्यभराचे तत्त्व आहे’, अशा भावनिक शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या नात्यांची परखड मांडणी केली.माजी मंत्री बाळासाहेब थोरात त्यांचे सख्खे मामा आहेत, याचा उल्लेखही त्यांनी विशेषत्वाने केला.

गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे आणि माजी मंत्री थोरात यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या; मात्र या चर्चांना पूर्णविराम देत तांबे म्हणाले, की ‘माझ्या राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा माझे कुटुंब, माझे नाते आणि त्यांचा सन्मान मला अधिक महत्त्वाचा वाटतो. मी कधीही कुटुंबाची रेषा ओलांडून राजकारण करणार नाही, हे मी राजकारणात प्रवेश करतानाच ठरवले आहे. माझा आणि माझ्या वडिलांचा राजकारणात प्रवेश हा केवळ बाळासाहेब थोरात यांना, म्हणजेच माझ्या मामांना मदत करण्यासाठी झाला आहे. आमच्यापेक्षा त्यांची महत्त्वाकांक्षा आम्हाला अधिक महत्त्वाची वाटते. त्यामुळे आमच्यात दुरावा निर्माण होण्याचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही. ते आमच्या कुटुंबाचे आणि राजकीय आयुष्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या मार्गाशी विसंगत पाऊल उचलण्याचा प्रश्‍नच नाही.

संभ्रम दूर

तांबे यांचे हे वक्तव्य केवळ राजकीय मतप्रदर्शन नसून, राजकारणात नात्यांचा सन्मान आणि कौटुंबिक मूल्यांची जपणूक कशी करावी, याचे आदर्श उदाहरण ठरते. यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणातील संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे.

लाईन क्रॉस करणार नाही

सध्या काही पक्षीय चर्चांमुळे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्या गोष्टी वेगळ्या आहेत. आमचे वैयक्तिक व कौटुंबिक संबंध प्रेमाचे, विश्‍वासाचे आणि दृढ आहेत. कोणीही ते दूषित करू शकत नाही, हे मी ठामपणे सांगतो. राजकीयदृष्ट्या मी कधीही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची लाईन कधीही क्रॉस करणार नाही आणि इथून पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत राहीन, असेही तांबे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

5 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

5 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

6 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

11 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

11 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

11 तास ago