महाराष्ट्र

अजितदादा असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल

विजय घाटगेंचा हललाबोल, मनोज जरांगेंसह बच्चू कडूंचा फोन

लातूर: अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना निवेदन दिलं.

यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. या घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी फोन केल्याची माहिती विजय घाटगे यांनी दिली.

दरम्यान, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्यानंतर घाटगे यांनी मनोज जरांगे पाटलांसह बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांचा फोन आला आहे. त्यामुळं अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी त्यांना नक्कीच भोवणार असल्याचं बोललं जात आहे. आरोग्याची तपासणी करतो. मग यातील लोकांच्या विरोधात तक्रारही देणार असल्याची माहिती विजय घाटगे यांनी दिली.

गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल

या घटनेवर मनोज जरांगे पाटील लक्ष ठेऊन आहेत. कारण राज्यातील शेतकऱ्याच्या पोरावर झालेला हल्ला आहे. कोणताही व्यक्तीगत द्वेष नव्हता, कोणतीही वैयक्तीक मागणी नव्हती. राज्याचा निष्क्रीय कृषीमंत्री बदला हे म्हणणं जर चुकीचं असेल तर अतिशय वाईट घटना आहे. मला बच्चू कडून, राजू शेट्टी मनोज जरांगे पाटील रविकांत तुपकर यांनी फोन केल्याचे विजय घाटगे म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांच्या पोरातला हा संताप आहे. राष्ट्रावादीची जी सत्तेची मस्ती आहे ती मस्ती शेतकऱ्यांची पोरं फतरवल्याशिवाय राहणार नाहीत असे विजय घाटगे म्हणाले. शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषीमंत्री भेटला आहे. त्याबाबात आम्ही बोलायचं नाही का? असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल असं आव्हान विजय घाटगे यांनी अजित पवार यांना दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपताच त्यांना निवेदन दिलं. माजी मंत्री संजय बनसोडे देखील तिथं उपस्थित होते. यावेळी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याच वेळी टेबलवर पत्ते देखील फेकण्यात आले. यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं.

सुनील तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना दिलं.निवेदन देत असतानाच त्यांच्यासमोर पत्ते टाकण्यात आले. गेम खेळायचा असेल तर घरी खेळा… असं सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

59 मिनिटे ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

2 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

2 तास ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

3 तास ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

3 तास ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

3 तास ago