अहिल्यानगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा उपटसूंभ असा उल्लेख केला आहे. रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, कुणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, मी त्याला उत्तर द्यायला बांधिल नाही.
तसेच माणिकराव ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू असंही ते म्हणाले. अहिल्यानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान म्हणून ओळख आहे. त्यांनी सर्वांना दिलेल्या न्यायाचे स्मरण अहिल्यानगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामुळेहोत राहील असं अजित पवार म्हणाले.
कुणी फुकटचा सल्ला देऊ नये
रोहित पवारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात दोन गट पडल्याचे म्हटले होते. तसेच मूळ राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला पुन्हा चिन्ह परत मिळेल असंही रोहित पवारांनी म्हटलं होतं.त्यावर अजित पवार म्हणाले की, “आमच्या पक्षात किती गट आहे ते आमचं आम्ही बघू, इतरांनी फुकटचा सल्ला देण्याचं कारण नाही. कोण काय बोलतं याच्याशी मला काही देणंघेणं नाही. महाराष्ट्रात कोणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही प्रश्न विचारेल. त्याला उत्तर द्यायला मी काही बांधिल नाही.
रामरक्षा आंदोलन, राष्ट्रवादी-एनडीए चर्चांपासून ते शिंदे-शाह भेटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर राऊतांची सडेतोड प्रतिक्रिया नागपूर: 18…
शिरूर (तेजस फडके): समोसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना कारेगाव (ता.…
धरणापासून अस्तरीकरण करण्याऐवजी टेलकडून काम सुरु करण्याचा घाट; प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह...?…
शिरूर (नितीन थोरात) : सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार…
नवी दिल्ली : 'उबाठा' गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…
मुंबई: राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात…