संभाजीनगर: बारावी नंतर तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुवर्णसंधी आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना राहणे आणि जेवण यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी सरकारकडून थेट 38,000 रुपये वार्षिक अनुदान दिले जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.
कोणाला मिळेल फायदा
इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना
कोष्टी, माळी, तेली, धनगर, कुणबी, कुंभार, सुतार, लोहार, फुलारी, गुरव, साळी, बंजारा इत्यादी समाजातील विद्यार्थ्यांना
ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबांना
दिव्यांग / अनाथ विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्रासह संधी
अर्ज कसा करावा
https://mahadbt.maharashtra.gov.in या DBT पोर्टलवर नोंदणी करा
लॉगिन करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना निवडा
वैयक्तिक माहिती व महाविद्यालयाचे तपशील भरा
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
जात प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र (2.5 लाखांपेक्षा कमी)
बारावी मार्कशीट
महाविद्यालय प्रवेश पत्र
आधार कार्ड + बँक पासबुक
दिव्यांग/अनाथ प्रमाणपत्र (लागल्यास)
Final Submit करा.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…