12 वी नंतर तालुक्याच्या ठिकाणी शिकत असाल तर मिळेल थेट 38,000 रुपये अनुदान

महाराष्ट्र

संभाजीनगर: बारावी नंतर तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुवर्णसंधी आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना राहणे आणि जेवण यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी सरकारकडून थेट 38,000 रुपये वार्षिक अनुदान दिले जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.

कोणाला मिळेल फायदा

इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना

कोष्टी, माळी, तेली, धनगर, कुणबी, कुंभार, सुतार, लोहार, फुलारी, गुरव, साळी, बंजारा इत्यादी समाजातील विद्यार्थ्यांना

ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबांना

दिव्यांग / अनाथ विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्रासह संधी

अर्ज कसा करावा

https://mahadbt.maharashtra.gov.in या DBT पोर्टलवर नोंदणी करा

लॉगिन करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना निवडा

वैयक्तिक माहिती व महाविद्यालयाचे तपशील भरा

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

जात प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र (2.5 लाखांपेक्षा कमी)

बारावी मार्कशीट

महाविद्यालय प्रवेश पत्र

आधार कार्ड + बँक पासबुक

दिव्यांग/अनाथ प्रमाणपत्र (लागल्यास)

Final Submit करा.