महाराष्ट्र

मतदार कार्ड नसल्यास ‘या’ 12 पुराव्यांपैकी कोणताही एक दाखवून करा मतदान

औरंगाबाद: महापालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र (Voter ID) दाखवून मतदान करता येते. मात्र, जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तरीही काळजी करू नका.

राज्य निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या खालील 12 ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून तुम्ही मतदान करू शकता

Voter ID नसल्यास हे 12 पुरावे ग्राह्य धरले जातील

पासपोर्ट

आधार कार्ड

वाहन चालविण्याचा परवाना

पॅन कार्ड

केंद्र/राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्रयुक्त ओळखपत्र

राष्ट्रीयीकृत बँक किंवा टपाल खात्याचे छायाचित्र असलेले पासबुक

सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला छायाचित्रयुक्त दिव्यांग (अपंगत्व) दाखला

मनरेगा (MGNREGA) अंतर्गत छायाचित्र असलेले जॉब कार्ड

निवृत्त कर्मचारी किंवा त्यांच्या विधवा/अवलंबितांचे छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र (पासबुक/प्रमाणपत्र)

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधान परिषद सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र

स्वातंत्र्यसैनिकाचे छायाचित्रयुक्त ओळखपत्र

केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले छायाचित्रयुक्त आरोग्य विमा कार्ड

महत्वाची सूचना

योग्य ओळख पुरावा सोबत ठेवा आणि तुमचा मतदानाचा हक्क नक्की बजावा

लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करा, देशासाठी जबाबदारी पार पाडा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

7 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

7 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

7 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

7 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

8 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

8 तास ago