महाराष्ट्र

ढाबा, हॉटेलात दारू प्याल तर…

संभाजीनगर: मोठ्या शहरात लोकसंख्या अधिक असल्याने लहान ढाबे आणि हॉटेल यांची संख्या खूप असते. अशा हॉटेल, ढाब्यांमध्ये बेकायदा दारू पिणाऱ्यांसाठी खास व्यवस्था केली जाते. दारूची व्यवस्था करून ग्राहक वाढविले जातात. अशात इतर वाईट गोष्टींना वाढ मिळते. तेव्हा ढाबा, हॉटेलात दारू पिणे आणि व्यवस्था करणे, अशी दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते.

दारूच्या किमतीपेक्षा दंड जास्त

ढाबा, हॉटेलमध्ये दारू पिणे बेकायदा आहे. कायद्याचे उल्लंघन करून अशा गोष्टी करणाऱ्यांवर कारवाई होते. तेव्हा ग्राहकाने घेतलेल्या दारूच्या बाटल्या, दारूच्या किमतीपेक्षा जास्त मोठ्या रकमेची कारवाई त्यांच्यावर केली जाते. ढाबा मालकाला दारूच्या किमतीपेक्षा अधिक दंडाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे उत्पादन विभागाची कारवाई बेकायदा दारू विकणाऱ्या ढाब्यावाल्याला महाग पडते.

छुप्या मार्गाने हॉटेल, ढाब्यावर दारू विक्री करणाऱ्यांकडून भेसळयुक्त दारू विकली जाण्याची शक्यता जास्त असते. अनेक गैरप्रकार होत असतात. तेव्हा परवानाशिवाय दारू विकणाऱ्या हॉटेल, ढाब्यांवर कारवाई केली जाते, असे मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे.

ढाबा मालकावरही कारवाई

परवाना नसताना ढाबा, हॉटेलमध्ये दारू विक्रीस ठेवणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, सोबत इतर गोष्टी पुरविणे अशा गोष्टी करणाऱ्या ढाबा, हॉटेलवरही कारवाई केली जाते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

14 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

16 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

21 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

21 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

21 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

21 तास ago