महाराष्ट्र

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी

मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून नाशिकच्या पुढील शतकभराच्या विकासाचा पाया ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिव्य मराठी आयोजित ‘वसा सिंहस्थाचा… वारसा नाशिकचा… गौरव महाराष्ट्राचा’ या सिंहस्थ कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ३२ हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची माहिती दिली.

शिंदे म्हणाले की, सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, मुख्यमंत्री अध्यक्ष असलेली शिखर समिती आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. कुंभाचे व्यवस्थापन व्यक्तींवर नव्हे तर सक्षम संस्थात्मक यंत्रणेवर आधारित असेल.

सिंहस्थासाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधांसह सुमारे ३२ हजार कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात येणार असून त्याचा दीर्घकालीन फायदा नाशिकला होईल, असे त्यांनी सांगितले.

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सिंहस्थाची सुरुवात होणार असून २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्नान होईल. सुमारे १२ कोटी भाविकांच्या आगमनाचा अंदाज असल्याने गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य सेवा, वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

साधूग्रामासाठी सुमारे १,४५० एकर क्षेत्र विकसित केले जाणार असून साधू-संत, आखाडे आणि भाविकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. “दिव्य, भव्य, सुरक्षित, स्वच्छ आणि पवित्र कुंभ” घडविण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी नाशिकसाठी ठाणे आणि पुण्याप्रमाणे युनिफाईड डीसीपीआर लागू करण्याची घोषणाही त्यांनी केली. “ऑन द स्पॉट डिसिजन” हीच सरकारची कार्यपद्धती असल्याचे सांगत सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…

1 तास ago

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…

1 तास ago

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

2 तास ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

2 तास ago

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…

2 तास ago

लोकमान्यांनी दिला स्वराज्याचा मंत्र, मोदी-शहा भारताला देत आहेत सुरक्षेचा मंत्र; एकनाथ शिंदे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून…

2 तास ago