महाराष्ट्र

आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स; राजनाथ सिंह

नवी दिल्ली: सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सनदेत भारत सरकारने आणि लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत सभागृहाला माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य दलांचे कौतुक केले. तर विरोधकांना देखील चांगलेच सुनावले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे, बंद केलेले नाही, असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे.

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. भारत आपल्या आत्मरक्षणासाठी सदैव तयार आहे. जर कोणी आमच्या नागरिकांना मारणार असेल तर, आमच्या मिसाईल्स सीमा पार करणारच. आमचे सैनिक शत्रू राष्ट्रात घुसून कारवाई करणारच. आम्ही दहशतवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी पूर्णपणे तत्पर आहोत.”

पुढे बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ” आम्ही पाकिस्तानच्या दबावाखाली युद्धबंदी केलेली नाही. ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे, बंद केलेलं नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत. संपूर्ण ऑपरेशन आम्ही २२ मिनिटात पूर्ण केले आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताचे यश आहे. तीनही सैन्य दलांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे.”

“आम्ही केलेली कारवाई ही पूर्णपणे आमच्या संरक्षणासाठी केलेली होती. ती चिथावणीखोर कारवाई नव्हती. पाकिस्तानने इलेक्ट्रॉनिक युद्धाचा वापर केला. त्यांच्या निशाण्यावर आपली अनेक विमानतळे आणि महत्वाची साधने होती. मात्र आपल्या सैन्य दलांनी पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला यशस्वीपणे उधळून लावला आहे.

“आम्ही दशतवादाला मुळापासून संपवण्याचा निर्धार केला आहे. आम्ही राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उध्वस्त केले आहेत. १०० पेक्षा जास्त दहशतवादी आणि हँडलर्स मारले गेले. भारत कोणत्याही अवस्त्र युद्धाच्या भीतीला भीक घालणार नाही. दहशतवादाचा बिमोड केला जाणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलांना कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पहलगाममधील हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. हे घृणास्पद आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

“१० मे रोजी पाकिस्तानवर भारतीय हवाई दलाने हल्ला केला. १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारले आहे. त्यानंतर पाकिस्तानकडून हल्ले थांबवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही ऑपरेशन सिंदूर केवळ थांबवले आहे, ते पूर्णपणे बंद केलेले नाही. पाकिस्तानने पुन्हा भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर, ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु केला जाईल, असे स्पष्टपणे राजनाथ सिंह यांनी संसदेतील चर्चेत स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

1 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

1 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

3 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

3 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

1 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago