महाराष्ट्र

एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या; अँड.अमोल मातेले

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व युवक अध्यक्ष (मुंबई), अँड. अमोल मातेले यांनी एसटी भाडेवाढीच्या निर्णयावर प्रखर टीका करत ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी या निर्णयामागील गोंधळावर आणि सरकारच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सरकारच्या गोंधळामुळे जनता हैराण

“परिवहन मंत्र्यांनी जर भाडेवाढीचा निर्णय घेतला नसेल, तर मग हा निर्णय कोण घेतो? हे खाते चालवतं कोण? असा प्रश्न उपस्थित करत सरकारमधील जबाबदारीच्या अभावावर त्यांनी थेट हल्ला चढवला आहे. एका बाजूला परिवहन मंत्री जबाबदारी झटकतात, तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा याला विरोध आहे. मग, एसटी भाडेवाढ हा निर्णय नेमका कुणाचा आहे? सरकारच्या प्रत्येक निर्णयामागे गोंधळच दिसतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का

“जर भाडेवाढीचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल, तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आणि जर चांगले निर्णय झाले तर मंत्र्यांना श्रेय, पण चुकीचे निर्णय झाले की अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे, ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. परिवहन खाते म्हणजे खेळाचा मैदान नाही, हा पोरखेळ जनतेला नकोय,” असे सांगत त्यांनी सरकारमधील अंतर्गत वादांवर प्रकाश टाकला.

सरकारमधील अंतर्गत भांडणे

“एसटीसारख्या महत्त्वाच्या सेवेवर सरकारचा कोणताही ठाम निर्णय नाही. मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये एकमेकांवर जबाबदारी टाकण्याचा खेळ सुरू आहे. परिणामी, सामान्य जनता त्रस्त होतेय. सरकारमध्ये खरेच काही ‘गंमत जंमत’ सुरू आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला.

एसटी सेवा – सामान्य जनतेचा आधार

“एसटी सेवा ही ग्रामीण आणि शहरी जनतेसाठी जीवनरेखा आहे. भाडेवाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांवर आर्थिक बोजा पडतो. सरकारने त्वरेने हा निर्णय मागे घेत जनतेला दिलासा द्यावा,” अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी केली.

राजकीय जबाबदारीची गरज

“सरकारने जनतेच्या हितासाठी काम करणे आवश्यक आहे. पण इथे मात्र केवळ अंतर्गत वाद आणि निर्णयांवर गोंधळ सुरू आहे. जर सरकारला जनतेची काळजी नसेल, तर त्यांनी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकारही नाही,” असे सांगून त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

अँड. अमोल मातेले

प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 

युवक अध्यक्ष, मुंबई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

6 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

6 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

6 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

6 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

6 तास ago