महाराष्ट्र

अवैध उत्खनन प्रकरणी खाणधारकासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

नागपूर: रायगड जिल्ह्यातील तुडाळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी खाणधारकाने सरकारचा १५ कोटी ३१ लाख ११ हजार ३२५ हुन अधिक दंडात्मक रक्कम न भरल्याप्रकरणी खाणधारकासह संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात लक्षवेधीद्वारे उपस्थित केली.

तुडाळ येथील सर्व्हे नं.१४/१. सव्र्हे नं.१३/२/१, १६/२ ही जमिन सरकारी अकारीपड असून महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय २३.१.२०१९ अन्वये शासकीय जमिनीवर लिलाव पद्धतीने खारपट्टा देण्याची तरतूद आहे. या ठिकाणी अवैध पद्धतीने उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी खनिकर्म अधिकारी यांनी ईटीएस मशिनद्वारे २.८.२०१८ रोजी मोजणी केली असता ४० हजार ५०० ब्रास उत्खनन झाल्याचे अहवाल सादर केला गेला.

या ठिकाणी अवैध उत्खनन झाल्याचे निदर्शनास येताच जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी पुन्हा १६.०५.२०१८ रोजी ईटीएस मशिनद्वारे मोजणी केली असता, खाणधारकाकडून १,०६, ८८३ ब्रास उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या दोन्ही आकडेवारीत तफावत असल्याचे समोर आले असून याबाबत खुलासा करण्याची मागणी दानवे यांनी केली. तसेच शासनाने या अवैध उत्खननप्रकरणी खाणधारकाला ५ पट दंड लावला. याविरोधात खाणधारकाने पुर्नवलोकनाचा विचार करण्यासाठी अपील केले.

एखाद्या खाणधारकाला दंड सुनावल्यावर त्याने दंडाच्या रकमेच्या २५ टक्के रक्कम भरण्याचा नियम आहे. मात्र त्याने कोणतीही रक्कम भरली नाही आणि या अपीलावर संबंधित अधिकाऱ्याने सुनावणी घेतली. एकप्रकारे कमी उत्खनन दाखवून महसुलाचा दंड वसूल करण्याऐवजी शासनाची लूट करण्यात आली याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. त्यामुळे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत दानवे यांनी मागणी लावून धरली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

49 मिनिटे ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

2 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

2 तास ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

2 तास ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

3 तास ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

3 तास ago