1० हजार रोजगाराचं काय झालं? महाबळेश्वरच्या सभेत थेट सवाल
मुंबई: राज्यात सध्या निवडणुकीचा धुरळा जोरात सुरू असून, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचाराचा वेग वाढवण्यात आला असून, विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेल्या प्रचारसभेत शिंदेंनी केलेल्या एका आगळ्यावेगळ्या कृतीमुळे ही सभा चांगलीच चर्चेत आली आहे.
महाबळेश्वरच्या प्रचारसभेत भाषण करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क भरसभेतून उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला. लाऊडस्पीकरवरून झालेल्या या संवादात शिंदेंनी दावोस (World Economic Forum) दौऱ्यात दिलेल्या १० हजार रोजगाराच्या आश्वासनाबाबत थेट जाब विचारला.
“मी इथे महाबळेश्वरला प्रचारासाठी आलो आहे. तुम्ही दावोसला गेलात तेव्हा या भागासाठी १० हजार लोकांना रोजगार देणारा उद्योग आणणार असल्याचं सांगितलं होतं, त्याचं काय झालं?” असा थेट सवाल शिंदेंनी केला.
यावर तत्काळ उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक माहिती दिली. “आपल्या आदेशानुसार संबंधित उद्योग प्रकल्प फायनल झाला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ८ ते १० हजार महिला आणि तरुणींना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. दावोस दौऱ्यातच याची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या आचारसंहिता लागू असल्याने पुढील कार्यवाही थांबवण्यात आली आहे. आचारसंहिता संपताच विशेष बैठक घेऊन प्रकल्पाच्या जागेचे नियोजन निश्चित केले जाईल,” असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
या थेट फोन संवादामुळे सभेत उपस्थित असलेल्या मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. रोजगाराचा मुद्दा थेट भरसभेत उचलून धरल्यामुळे शिवसेनेच्या प्रचाराला अधिक धार मिळाल्याचे चित्र आहे.
महापालिका आणि नगर परिषद निवडणुकांचे निकाल ताजे असतानाच आता जिल्हा परिषद निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेने मायक्रो प्लॅनिंगवर भर दिला आहे. एकनाथ शिंदे राज्यभरात ३० हून अधिक सभा आणि रोड शो करणार असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रचार रणनीती आखण्यात आली आहे. भाषणांमध्ये केवळ राजकीय टीका न करता दावोस येथे झालेले सामंजस्य करार, स्थानिक रोजगार, उद्योग आणि पायाभूत सुविधांवर शिंदे भर देताना दिसत आहेत.
सातारा हा उपमुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा असल्याने महाबळेश्वरसारख्या महत्त्वाच्या भागात रोजगाराचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी स्थानिक मतदारांना थेट साद घातली आहे. ८ ते १० हजार महिला व तरुणींना रोजगार देणारा हा प्रस्तावित प्रकल्प सातारा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…