महाराष्ट्र

भरसभेत शिंदेंनी उदय सामंतांना लावला फोन स्पीकर वर ठेवला अन…

1० हजार रोजगाराचं काय झालं? महाबळेश्वरच्या सभेत थेट सवाल

मुंबई: राज्यात सध्या निवडणुकीचा धुरळा जोरात सुरू असून, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचाराचा वेग वाढवण्यात आला असून, विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेल्या प्रचारसभेत शिंदेंनी केलेल्या एका आगळ्यावेगळ्या कृतीमुळे ही सभा चांगलीच चर्चेत आली आहे.

महाबळेश्वरच्या प्रचारसभेत भाषण करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क भरसभेतून उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला. लाऊडस्पीकरवरून झालेल्या या संवादात शिंदेंनी दावोस (World Economic Forum) दौऱ्यात दिलेल्या १० हजार रोजगाराच्या आश्वासनाबाबत थेट जाब विचारला.

“मी इथे महाबळेश्वरला प्रचारासाठी आलो आहे. तुम्ही दावोसला गेलात तेव्हा या भागासाठी १० हजार लोकांना रोजगार देणारा उद्योग आणणार असल्याचं सांगितलं होतं, त्याचं काय झालं?” असा थेट सवाल शिंदेंनी केला.

यावर तत्काळ उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक माहिती दिली. “आपल्या आदेशानुसार संबंधित उद्योग प्रकल्प फायनल झाला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ८ ते १० हजार महिला आणि तरुणींना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. दावोस दौऱ्यातच याची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या आचारसंहिता लागू असल्याने पुढील कार्यवाही थांबवण्यात आली आहे. आचारसंहिता संपताच विशेष बैठक घेऊन प्रकल्पाच्या जागेचे नियोजन निश्चित केले जाईल,” असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

या थेट फोन संवादामुळे सभेत उपस्थित असलेल्या मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. रोजगाराचा मुद्दा थेट भरसभेत उचलून धरल्यामुळे शिवसेनेच्या प्रचाराला अधिक धार मिळाल्याचे चित्र आहे.

महापालिका आणि नगर परिषद निवडणुकांचे निकाल ताजे असतानाच आता जिल्हा परिषद निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेने मायक्रो प्लॅनिंगवर भर दिला आहे. एकनाथ शिंदे राज्यभरात ३० हून अधिक सभा आणि रोड शो करणार असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रचार रणनीती आखण्यात आली आहे. भाषणांमध्ये केवळ राजकीय टीका न करता दावोस येथे झालेले सामंजस्य करार, स्थानिक रोजगार, उद्योग आणि पायाभूत सुविधांवर शिंदे भर देताना दिसत आहेत.

सातारा हा उपमुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा असल्याने महाबळेश्वरसारख्या महत्त्वाच्या भागात रोजगाराचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी स्थानिक मतदारांना थेट साद घातली आहे. ८ ते १० हजार महिला व तरुणींना रोजगार देणारा हा प्रस्तावित प्रकल्प सातारा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

50 मिनिटे ago

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…

52 मिनिटे ago

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…

2 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…

2 तास ago

काळ्या जादूने माजी सरपंचांच्या खुनाचा कट? झाडावर फोटो टांगून अघोरी पूजा; मुख्य आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरात भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून कथित अघोरी पूजा…

2 तास ago

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पुनर्जन्म

२०१९ नंतरच्या राजकीय घडामोडींवर समर्थकांच्या दृष्टिकोनातून सविस्तर मतप्रदर्शन मुंबई: राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम…

2 तास ago