मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा
मुंबई: दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करत पक्षाने केंद्र सरकारवर लोकशाही दडपल्याचा आरोप केला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
हे आंदोलन पक्षाचे मुंबई अध्यक्ष व माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे, युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले आणि वैभव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले. सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
यावेळी मिलिंद अण्णा कांबळे म्हणाले की, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे. शिक्षण क्षेत्रातील अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा देशातील तरुण सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले आणि वैभव गाढवे यांनीही सरकारने लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न थांबवावा, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.
दरम्यान, या आंदोलनात करण्यात आलेले आरोप आणि मागण्या या संबंधित पक्षाच्या भूमिका असून त्यावर केंद्र सरकारची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…
वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…
राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…
मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरात भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून कथित अघोरी पूजा…