महाराष्ट्र

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची टीका

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ जोरदार टीका करत, “रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा,” असा टोला लगावला. हिंदुत्व ही गरजेनुसार वापरण्याची गोष्ट नसून ती विचारसरणी असल्याचे सांगत त्यांनी उबाठाने काँग्रेससोबत युती करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोप केला.

शिंदे म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी पित्याच्या वचनासाठी १४ वर्षांचा वनवास पत्करला, मात्र ज्यांनी स्वतःच्या वडिलांचे विचारच सोडले त्यांना श्रीरामांच्या आदर्शांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. हे आंदोलन रामरक्षेसाठी नसून स्वतःच्या पक्षाच्या रक्षणासाठी असल्याचा दावा त्यांनी केला.

रामरक्षा आंदोलनाचे निमंत्रण देण्यापूर्वी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अखिलेश यादव यांना बोलवावे, त्यानंतरच RSS प्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण द्यावे, अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात आले आणि कलम ३७० हटवण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी या निर्णयांचे स्वागत केले असते, असे सांगत शिंदे यांनी उबाठाच्या नेतृत्वावर मोदी आणि अमित शाह यांच्यावर सातत्याने टीका करण्याचा आरोप केला.

२०१९ मध्ये सत्तेसाठी उबाठाने बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली असून महाराष्ट्रातील जनतेने निवडणुकीत त्यांना त्याचे उत्तर दिले, असा दावाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

11 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

14 तास ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

16 तास ago

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…

16 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…

17 तास ago

काळ्या जादूने माजी सरपंचांच्या खुनाचा कट? झाडावर फोटो टांगून अघोरी पूजा; मुख्य आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरात भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून कथित अघोरी पूजा…

17 तास ago