महाराष्ट्र

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का?

मुंबई: रायगड, नांदेड, लातूर, ठाणे, तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हिंसाचार, राज्यात महिलांवरील बलात्काराच्या वाढत्या घटना, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, त्यामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात खोके देऊन फक्त आमदार, खासदार विकत घेण्याचं सरकारच धोरण आहे. राज्यात आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालं आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी केला.

पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगडा पायथ्याशी रविवारी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिची हत्या होणं महाराष्ट्र साठी अतिशय दुर्दैवी बाब आहे. त्याच सोबत गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत वस्तीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीची हत्या झाली.तर नुकतंच चालू लोकलमध्ये महिला डब्यात एका तरुणानं मुलीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला .तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेराव या तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना ताजी असतानाच.

लातूरमधील रेणापूर येथे सावकाराकडून फक्त तीन हजार रुपयांसाठी एका दलित व्यक्तीची डोळ्यात मिरचीपूड टाकून बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. हे सगळं कमी म्हणून काय तर मीरारोड येथील एका गृहस्थाने आपली पार्टनर सरस्वती हीचा निर्घृन खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले, त्यांना नष्ट करण्यासाठी ते कुकरमध्ये शिजवले, या घटना पुरोगामी महाराष्ट्राला व मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे बघते एडवोकेट अमोल मातेले यांनी सांगितले

राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीही महिलांबाबत असंवेदनशील आहे. या घडणाऱ्या घटना राज्याला अस्वस्थ करणाऱ्या असल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यातील कयदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं स्पष्ट होत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ असा बीजेपीच धोरण असलं तरी त्यांच्या राज्यात महिला, माता, भगिनी सुरक्षित नाही हे वारंवार स्पष्ट होत आहे. या सगळ्या घटना पाहता थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

1 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

1 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

2 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

2 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 दिवस ago