मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकृत घोषणाही पक्षाकडून करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती म्हणून पाहिली जात आहे.
जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर होते. त्यांनी अनेक निवडणुका पक्षाच्या नेतृत्वाखाली लढवल्या आहेत. मात्र, सध्या पक्षात नव्या दमाच्या नेतृत्वाची गरज असल्याने, त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शशिकांत शिंदे हेही अनुभवी आमदार असून, ग्रामीण महाराष्ट्रात त्यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे पक्षसंघटना बळकट करण्यासाठी त्यांच्या निवडीला प्राधान्य देण्यात आलं आहे.
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…