औरंगाबाद: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने काही दिवसांपूर्वीच 5G सेवा लाँच केली आहे. कंपनी आपल्या सेवेचा हळूहळू विस्तार करत असून आता कंपनीने देशभरातील आणखी 11 शहरात 5G सर्व्हिस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या 11 शहरामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना आता हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ मिळेल. यापूर्वी राज्यातील मुंबई आणि पुण्यात Jio 5G सर्विस सुरु करण्यात आली होती.
जिओ ने आता औरंगाबाद, नाशिक, लखनौ, त्रिवेंद्रम, म्हैसूर आणि चंदीगड, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड आणि डेराबस्सी याठिकाणी 5G सेवा करण्याची घोषणा केली आहे. या शहरातील यूजर्सना जिओ वेलकम ऑफर’ अंतर्गत आमंत्रित केले जाईल. त्यानंतर जिओ यूजर्सना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1Gbps पेक्षा जास्त वेगाने अमर्यादित डेटा मिळणार आहे.
Jio 5G Welcome Offer चा फायदा कसा घ्याल?
Jio वेलकम ऑफर कंपनीच्या MyJio App या अॅपवर उपलब्ध आहे. कंपनीने ५जी नेटवर्क उपलब्ध असलेल्या शहरातील यूजर्सला या ऑफरचा फायदा घेण्यासाठी इनव्हाइट केले आहे. MyJio App तुम्हाला टॉपवर एक बॅनर मिळेल. ज्यामध्ये जिओ ५जी चा उल्लेख करण्यात आला आहे. या वर क्लिक केल्यानंतर I’m Interested चा ऑप्शन मिळेल. यावर क्लिक करुन तुम्ही Jio Welcome Offer साठी रजिस्टर करु शकता.
शिरुर (तेजस फडके) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावात रेणुकामाता यात्रेनिमित्त दि 25 मे 2024 रोजी…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…
शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…
पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…