महाराष्ट्र

काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘प्रतिभा शोध’ अभियानात सहभागी व्हा; हरी शंकर गुप्ता

मुंबई: काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि काँग्रेसचा विचार, इतिहास, लोकशाही व संविधानवादी मूल्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या वतीने ‘प्रतिभा शोध’ (Talent Hunt) अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व स्तरांतील लोकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे माजी आमदार व या अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी हरी शंकर गुप्ता यांनी केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हरी शंकर गुप्ता म्हणाले की, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक विषयांवर उत्तम ज्ञान असलेली प्रतिभावंत माणसे आहेत. अशा लोकांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. या अभियानातून निवड झालेल्यांना संशोधन विश्लेषक, प्रवक्ते तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागात काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

हे अभियान तीन टप्प्यांत राबवले जाणार असून इच्छुक उमेदवारांनी १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. त्यानंतर अर्जांची छाननी करून काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पत्रकार, इतिहासतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची समिती उमेदवारांच्या मुलाखती घेईल. अंतिम निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमार्फत केली जाणार आहे. देशभरात हे अभियान सुरू असून उत्तर प्रदेशातून ५५०, जम्मू-काश्मीरमधून १०० तर झारखंड व ओडिशामधूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, अनेकांना राजकारणात येण्याची इच्छा असते, मात्र योग्य मार्ग मिळत नाही. समाजातील प्रतिभावंत लोकांना संधी देण्यासाठी काँग्रेस पक्षाने हा पारदर्शक उपक्रम सुरू केला आहे. लवकरच राज्याच्या सहाही विभागांत पत्रकार परिषद घेऊन या अभियानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

आर्थिक सर्वेक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अतुल लोंढे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेल्याचे चित्र आर्थिक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रम अपयशी ठरला असून आयात वाढली आहे. राज्य सरकारांवर कर्जाचा बोजा वाढत असून विकास योजनांवरील खर्चात कपात करावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

20 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

20 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

21 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

21 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

2 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

2 दिवस ago