पुणे: पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) खासगी संस्थेमार्फत चालवण्यात येत असून, या संस्थेसोबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या करारानुसार रुग्णालयातील एकूण १७ आयसीयू खाटांपैकी ७ खाटा थेट महानगरपालिकेच्या ताब्यात येणार असून, या खाटांवर दाखल होणाऱ्या रुग्णांना मोफत अतिदक्षता उपचार सेवा दिली जाणार आहे. ही सुविधा फेब्रुवारीअखेर रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे.
कमला नेहरू रुग्णालय हे राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) अंतर्गत संलग्न असल्याने, बहुतांश शस्त्रक्रिया व उपचार मोफत केले जातात. मात्र, आयसीयू सेवा सध्या शुल्क आकारून दिली जात असल्याने अनेक गंभीर व गुंतागुंतीचे रुग्ण ससून रुग्णालयात पाठवावे लागत होते.
सध्या या आयसीयू विभागातील उपचार शुल्क केंद्रीय आरोग्य योजनेच्या दरानुसार आकारले जाते. रुग्णालयातील अंतर्गत रुग्णांना प्रथम प्राधान्य दिले जाते, तसेच परवडणाऱ्या दरात आयसीयू खाटांची गरज असलेल्या इतर रुग्णालयांतील रुग्णांनाही येथे उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
महानगरपालिकेच्या ताब्यात ७ आयसीयू खाटा आल्यामुळे संबंधित रुग्णांना मोफत आयसीयू सेवा, आवश्यक साहित्य व उपचार सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील कमला नेहरू रुग्णालयातच करता येणार असल्याची माहिती उप आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली. रुग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे काम अंतिम टप्प्यात असून, फेब्रुवारीअखेर तेही रुग्णांसाठी खुले होणार आहे.
याच वर्षाअखेरीस महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पहिली एमबीबीएस विद्यार्थ्यांची तुकडी प्रशिक्षणासाठी रुग्णालयात रुजू होणार असून, त्यामुळे रुग्णालयाची उपचार क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्य विभागप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, ७ आयसीयू खाटा महापालिकेच्या नियंत्रणाखाली आल्याने रुग्णांना अधिक दर्जेदार आणि सुलभ सेवा देणे शक्य होणार आहे. अलीकडेच रुग्णालयात १७ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात उपचार सेवा अधिक सक्षम होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…