महाराष्ट्र

डीपीआरपूर्वी मंजुरीमुळे कुंभमेळ्याची विकासकामे रखडली; नाशिकच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न विधानपरिषदेत

मुंबई: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार होण्यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्यामुळे अनेक प्रकल्प रखडले असून त्याचा फटका नाशिककरांना बसत असल्याचा मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.

तांबे यांनी शासनाने कुंभमेळ्याची कामे वेळेत सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचे स्वागत करताना, डीपीआरपूर्वी मंजुरी दिल्यामुळे भूसंपादन पूर्ण न झाल्याने अनेक रस्ते व विकासकामे अडकून पडल्याचे निदर्शनास आणले. भूसंपादनाचा काही भाग प्रलंबित असल्याने संपूर्ण प्रकल्प रखडत असून, त्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रयागराजनंतर होणाऱ्या कुंभमेळ्यात यंदा भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, शासनाने मंजूर केलेल्या हजारो कोटी रुपयांपैकी प्रत्यक्षात किती निधी नाशिक महापालिका, कुंभमेळा प्राधिकरण, एमएसआरडीसी आणि इतर संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे, याची स्पष्ट माहिती सभागृहात देण्याची मागणी त्यांनी केली.

कुंभमेळ्याच्या कामांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी, अशीही मागणी तांबे यांनी केली.

यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केंद्र व राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत कुंभमेळ्यासाठी एकूण ३४ हजार ७३२.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, आमदार सत्यजीत तांबे यांच्या सूचनेनुसार मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

डीपीआरबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नावर उत्तर देताना सामंत म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला आवश्यकतेनुसार कामांमध्ये बदल करण्याचे व नवीन कामांना मंजुरी देण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र डीपीआरची आवश्यकता नसून, रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामे आणि भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यातील आहार कसा असावा

आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…

49 मिनिटे ago

किचनमध्ये काम करताना त्वचेला चटका लागल्यावर टूथपेस्ट लावता

अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…

53 मिनिटे ago

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

14 तास ago

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…

15 तास ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

15 तास ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

15 तास ago