महाराष्ट्र

मोठ्या पगाराचे आमिष दाखवून तरुणांची आंतरराष्ट्रीय तस्करी, सुटकेसाठी धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह देशातील शेकडो तरुणांची आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करून त्यांना म्यानमार-थायलंड सीमेवरील छळछावण्यांमध्ये डांबून जबरदस्तीने सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन संबंधित तरुणांच्या तातडीच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतील २० ते २५ तरुण, तर देशभरातील सुमारे ७०० ते ८०० तरुण म्यानमार-थायलंड सीमेवरील ‘गोल्डन ट्रँगल’ परिसरातील छळछावणीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणांना शारीरिक छळ करून त्यांच्याकडून सायबर गुन्हे करून घेतले जात असल्याची तक्रार बीड सायबर पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणांपर्यंत पोहोचला असून, अडकलेले तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून सुटकेचे प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे धनंजय मुंडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व परराष्ट्र मंत्रालयाच्या समन्वयातून संबंधित तरुणांची सुरक्षित सुटका करण्यात यावी. तसेच सोशल मीडियाद्वारे मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या एजंटांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

TET पेपरफुटीप्रकरणी विधानभवनात शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे; NSUI चे आंदोलन

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीप्रकरणी काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI आक्रमक झाली असून, आज विधानभवन…

3 मिनिटे ago

महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यास शासन कटिबद्ध; डॉ. राजेश गवांदे

मुंबई: महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा (Oral Healthcare) क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य…

13 मिनिटे ago

नसरापूर प्रकरणातील फाशीच्या शिक्षेचे शिवसेना महिला आघाडीने केले स्वागत; शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी

मुंबई: नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल शिवसेना…

45 मिनिटे ago

एमएमआरचा सर्वांगीण विकास काही वर्षांत प्रत्यक्षात; परवडणारी घरे आणि आधुनिक वाहतूक सुविधांवर भर; डॉ. श्रीकांत शिंदे

मुंबई: परवडणारी घरे, दर्जेदार मूलभूत सुविधा आणि आधुनिक दळणवळण व्यवस्था या तीन प्रमुख बाबींवर भर…

50 मिनिटे ago

बिश्नोई गँगवर सरकारला काँग्रेसचा घेराव; कायदा-सुव्यवस्थेवर विजय वडेट्टीवार यांचे गंभीर प्रश्न

मुंबई: राज्यात बिश्नोई गँगच्या नावावरून सुरू असलेल्या खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या वाढत्या घटनांवरून…

54 मिनिटे ago

बदर समितीचा अहवाल जाहीर केल्याशिवाय उपवर्गीकरणाचे विधेयक आणू नका; विजय वडेट्टीवार

मुंबई: अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर मुंबईत निघालेल्या मोठ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय…

1 तास ago