महाराष्ट्र

अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ; कोल्हापुरात ‘विकासाची पंचगंगा’ वाहणार; एकनाथ शिंदे

कोल्हापूर: श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे कोल्हापूरला जागतिक धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर नवे स्थान मिळेल आणि शहरात “विकासाची पंचगंगा वाहणार” असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी सांगितले की, अंबाबाई मंदिराचा विकास प्रकल्प हा केवळ मंदिर परिसराच्या सुशोभीकरणापुरता मर्यादित नसून कोल्हापूरच्या सांस्कृतिक, धार्मिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना देणारा ठरेल. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सुरू असलेल्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा उल्लेख करत त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर, अयोध्या राम मंदिर आणि उज्जैनमधील महाकाल लोक प्रकल्पांचा संदर्भ दिला. धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमित शहा यांच्या उपस्थितीमुळे या विकासकामाला अधिक बळ मिळाल्याचे सांगत शिंदे यांनी राष्ट्रीय सुरक्षा, सहकार क्षेत्रातील सुधारणा आणि शेतकरी हिताच्या निर्णयांसाठीही त्यांचे कौतुक केले.

राज्य सरकार विविध तीर्थक्षेत्रे, प्राचीन मंदिरे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे नवे पर्व ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

12 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

12 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

15 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

15 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

16 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

16 तास ago