महाराष्ट्र

जनादेशाचा बाजार, संविधानावर घाव; पक्षफोडीच्या राजकारणावर काँग्रेसची टीका

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी जनादेशाची पायमल्ली, पक्षफोडीचे राजकारण आणि संविधानिक संस्थांच्या भूमिकेबाबत भाष्य करत सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका केली आहे. लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नसून जनतेच्या विश्वासाची आणि जनादेशाच्या पवित्रतेची व्यवस्था असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘ऑपरेशन लोटस’ आणि ‘ऑपरेशन टायगर’सारख्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची फोडाफोड करून सत्तेची समीकरणे बदलण्याच्या प्रवृत्तीवर आक्षेप घेतला. निवडणुकीनंतर पैसा, पदे आणि इतर प्रलोभनांच्या आधारे जनादेश बदलण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या आत्म्यावर घातलेला घाव असल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्षांतरबंदी कायद्याचा उद्देश जनादेशाचे संरक्षण करणे हा असला तरी निर्णय प्रक्रियेतील विलंब, अपात्रतेच्या प्रकरणांवरील कारवाईचा अभाव आणि न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाईमुळे या कायद्याची प्रभावीता कमी झाल्याची टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत बिक्कड यांनी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नांमुळे लोकशाही कमकुवत होत असल्याचा आरोप केला. मतदार केवळ व्यक्तीला नव्हे तर पक्ष, विचारसरणी आणि नेतृत्वालाही मतदान करत असतात. त्यामुळे पक्ष बदलणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जाण्याची तयारी दाखवावी, असे ते म्हणाले.

लोकशाहीची खरी ताकद निवडणुकीत नसून जनादेशाच्या सन्मानात आहे. सत्तेसाठी जनादेशाशी तडजोड करण्याची प्रवृत्ती वाढल्यास लोकशाहीवरील जनतेचा विश्वास कमी होईल, असा इशाराही त्यांनी दिला. जनादेशाचा सन्मान राखत लोकशाही अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या लेखातून अधोरेखित केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा…

40 मिनिटे ago

ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यास राज्यभर आंदोलन; विजय वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे…

53 मिनिटे ago

देशाचे पहिले शक्तीपीठ मोदी, दुसरे शक्तीपीठ अमित शाह; एकनाथ शिंदे

इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे…

55 मिनिटे ago

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात उच्च न्यायालयात अपील; अमित शाह यांचे सीबीआयला निर्देश; एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून…

1 तास ago

अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ; कोल्हापुरात ‘विकासाची पंचगंगा’ वाहणार; एकनाथ शिंदे

कोल्हापूर: श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय…

1 तास ago

MIFF 2026 मधील मराठी लघुपट व माहितीपट महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ निमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीत आयोजित करण्यात आलेल्या मराठी…

1 तास ago