महाराष्ट्र

महिलांचा सन्मान आणि सुरक्षा करुन सरकार चालवू…

मुंबई: महिलांचा सन्मान आणि सुरक्षा करुन सरकार चालवू असे आश्वासन नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशातील जनतेला दिले होते परंतु आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन करणार्‍या महिला कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा दिल्लीत जंतरमंतरवर जो प्रकार झाला त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

गेले दहा दिवस दिल्लीच्या जंतरमंतरवर महिला कुस्तीपटू आंदोलनाला बसल्या आहेत. काल मध्यरात्री पोलिसांनी पाऊस सुरु असताना लाठीचार्ज केला आणि शिवीगाळ करून आंदोलनाचा अधिकार मोडण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारच्या पोलीसांनी केला याबद्दल महेश तपासे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा, त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी आणि त्यांच्या मागण्यांवर यथोचित कारवाई व्हावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

देशातील बेरोजगारीचा एक डेटा प्रसिद्ध झाला असून त्यात चार महिन्यांचा उच्चांक बेरोजगारीने मोडला आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करु आणि देशात ‘अच्छे दिन’ आणू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु दिवसेंदिवस पाहिले तर बेरोजगारीचा आलेख वाढतच चालला आहे. रोजगाराची संधी उपलब्ध नाही. कनिष्ठ पदावर उच्चशिक्षित लोक येऊ लागले आहेत. याचा अर्थ बेरोजगारी आटोक्यात आणण्यामध्ये भाजपसरकार फेल ठरले आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

या देशातील बेरोजगारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूर करु शकत नाहीत त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत देशातील सुशिक्षित तरुण बेरोजगार हा मोदींच्या भुलथापांना बळी न पडता भाजपला मतदान करणार नाही, असा दावाही महेश तपासे यांनी केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

13 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

19 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

19 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

19 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

19 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago