मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक तसेच सर्व क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि मन सुन्न करणारे आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक अत्यंत अभ्यासू, अनुभवी, कर्तबगार, अजातशत्रू आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
मंत्री रावल म्हणाले की, अजित पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेती, जलसंपदा, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास तसेच ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. सामान्य माणसाच्या प्रश्नांबाबत ते नेहमीच संवेदनशील होते. कठोर निर्णयक्षमता, प्रशासनावर मजबूत पकड आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांच्या नेतृत्वाची प्रमुख ओळख होती.
“माझ्या शालेय जीवनापासून त्यांच्याशी माझा संबंध आणि संवाद होता. पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये मी शिक्षण घेत असताना त्यांनी मला बोलावून माझी मुलाखत घेतली होती. पुढे राजकारणात आमदार झाल्यानंतर जिल्ह्यातील विकासाच्या अनेक योजनांसाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. साक्री तालुक्यातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी केल्यानंतर त्यांनी ती मंजूर केली. काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील सोयाबीन, तूर खरेदी तसेच एकूणच पणन क्षेत्राशी संबंधित विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले,” असेही मंत्री रावल यांनी सांगितले.
त्यांच्या निधनाने केवळ एका राजकीय नेत्याचा नव्हे, तर राज्याच्या विकासप्रक्रियेला दिशा देणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे. ही हानी भरून न निघणारी असून महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवेल, असे मंत्री रावल म्हणाले.
या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती व आप्तस्वकीयांप्रती मी मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व कुटुंबीयांना हे असह्य दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…