नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदार दिल्लीत असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच हे खासदार लोकसभा अध्यक्ष Om Birla यांची भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापनेबाबत पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात खळबळ उडाली असून पक्षाने आपल्या खासदारांना व्हिप जारी केल्याचे समजते. सर्व खासदारांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आल्याने राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या Sushma Andhare यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की, पुण्यातून काल रात्री एका चार्टर विमानाने काही नेत्यांना दिल्लीला नेण्यात आले. या विमानाच्या हालचालींमध्ये Tanaji Sawant यांची प्रमुख भूमिका होती, असा आरोप त्यांनी केला.
अंधारे यांनी पत्रकार परिषदेत काही खासदार आणि नेत्यांची नावे घेत पक्षांतराच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्यावरही टीका करत पक्षाशी बेईमानी केल्याचा आरोप केला. “याला क्रांती म्हणत नाही, याला चापलुसी म्हणतात,” असे म्हणत त्यांनी संबंधित नेत्यांवर निशाणा साधला.
तसेच, “मशाल चिन्हावर मिळालेले मतदान हे शिवसैनिकांच्या विश्वासाचे होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे,” असेही अंधारे म्हणाल्या. त्यांनी भाजपवरही टीका करत विरोधकांचे नेते फोडण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला.
या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटातील संभाव्य फूट आणि शिंदे गटाच्या ताकदीत होणारी वाढ याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, संबंधित खासदारांकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही तासांत दिल्लीतील राजकीय घडामोडी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…