CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव शेरी येथील गुरुनानक स्वीट मार्टमधून खरेदी केलेले पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या भावाच्या नवीन कारच्या डिलिव्हरीसाठी कुटुंबीय आणि मित्रमंडळी शोरूममध्ये जमली होती. यावेळी आनंद साजरा करण्यासाठी पेढे वाटण्यात आले. मात्र काही तासांतच उपस्थितांपैकी अनेकांची तब्येत बिघडू लागली. पीडित आसिफ काजी यांनी सांगितले की, त्यांच्या 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील सात ते आठ जणांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास झाला. मुलीला गंभीर डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले, तर इतरांनाही वैद्यकीय उपचार घ्यावे लागले.
दरम्यान, खराडी आणि वडगाव शेरी परिसरातील इतर काही कुटुंबांनीही गुरुनानक डेरीमधून आणलेल्या पेढ्यांमुळे अशाच प्रकारे आजारी पडल्याचा दावा केला आहे. एका तक्रारदार डॉक्टर महिलेच्या माहितीनुसार, या प्रकारात सुमारे 40 ते 45 जण बाधित झाले असावेत.
घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) तातडीने सक्रिय झाले असून गुरुनानक डेरीचे विक्री केंद्र आणि उत्पादन युनिट सील करण्यात आले आहे. पेढे आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. भेसळ, दूषित घटक, निकृष्ट दर्जाचा खवा, स्वच्छतेचा अभाव किंवा जुनी मिठाई यापैकी नेमके कोणते कारण जबाबदार आहे, याचा तपास सुरू आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर या प्रकरणातील कारवाईला वेग आला असून तपास अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे. पुण्यातील हा प्रकार सध्या नागरिकांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…