महाराष्ट्र

टाटा समूहात मोठा उलटफेर! एन. चंद्रशेखरन यांचा राजीनामा; फेब्रुवारी 2027 नंतर नव्या नेतृत्वाची तयारी

मुंबई : टाटा समूहाबाबत आज मोठी बातमी समोर आली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा दिला असून, त्यांचा सध्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते पुनर्नियुक्तीसाठी अर्ज करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा विद्यमान कार्यकाळ फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार आहे.

चंद्रशेखरन यांनी 12 ऑगस्ट रोजी टाटा सन्सच्या संचालक मंडळाला आपल्या निर्णयाची माहिती दिली. 18 ऑगस्ट रोजी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) होणार आहे. या सभेपूर्वीच त्यांचा हा निर्णय समोर आल्याने टाटा समूहाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत चर्चांना वेग आला आहे.

चंद्रशेखरन यांच्या संचालक म्हणून पुनर्नियुक्तीचा मुद्दा यंदाच्या AGMमध्ये महत्त्वाचा ठरणार होता. मात्र, त्यांच्या पुढील कार्यकाळाबाबत टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्समध्ये मागील काही महिन्यांपासून मतभेद असल्याचे वृत्त आहे. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी समूहातील काही व्यवसायांच्या कामगिरीबाबत आणि भविष्यातील धोरणांबाबत चिंता व्यक्त केल्याचेही समोर आले आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या पुढील कार्यकाळाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. टाटा ट्रस्ट्सकडे टाटा सन्समध्ये सुमारे 66 टक्के हिस्सा असल्याने या मतभेदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले.

एन. चंद्रशेखरन यांनी 2017 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने विमान वाहतूक, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर आणि डिजिटल व्यवसायांसह विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या विस्तारावर भर दिला. आता त्यांच्या निर्णयामुळे टाटा समूहाच्या पुढील नेतृत्वाची निवड हा महत्त्वाचा विषय ठरणार आहे.

दरम्यान, चंद्रशेखरन यांच्या निर्णयानंतर टाटा समूहातील काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये दबाव दिसून आला. विशेषतः टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. त्यामुळे या राजीनाम्याचा बाजारावरही परिणाम झाल्याचे दिसत आहे.फेब्रुवारी 2027 नंतर टाटा समूहाची धुरा कोणाच्या हाती जाणार, याकडे आता उद्योगविश्वाचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वाभिमानीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १२ ठराव; कर्जमाफीसह शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकरी, शेतमजूर…

1 मिनिट ago

भीमा नदीत वाहून गेलेल्या साहेबराव मुळीक यांचा तीन दिवसांनी मृतदेह सापडला

शिरूर : भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक…

7 मिनिटे ago

सोलापूर-पुणे महामार्गावरील अतिक्रमणांवर आता कारवाईचा बडगा

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार…

11 मिनिटे ago

संजय राऊत अन् नरेश म्हस्के आमनेसामने; ‘अरे ये ना… यावंच लागणार आहे ना!’ म्हणत राऊतांचा टोला

धनुष्यबाणाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे-शिंदे गटात खडाजंगी; नेमकं काय घडलं? नवी दिल्ली : शिवसेना पक्ष…

46 मिनिटे ago

पुणे मार्केट यार्डात डाळिंबाची विक्रमी आवक; १०० टन माल दाखल

पुणे : डाळिंबाचा हंगाम सुरू होताच पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची विक्रमी…

50 मिनिटे ago

12 ऑगस्टला वर्षातील खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार नाही, लाईव्ह स्ट्रीमिंगचा पर्याय

मुंबई : आकाशप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार…

1 तास ago