महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख गंभीर आणि अमान्य; अँड.अमोल मातेले

महाराष्ट्र शासनाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे, जो अत्यंत गंभीर आणि अन्यायकारक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे.

एडवोकेट अमोल मातेले म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख केल्याने समाजात भेदभाव वाढू शकतो, तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात समानता आणि समता राखणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरीत मागे घेतला गेला पाहिजे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यावर त्वरित स्पष्टीकरण द्यावे आणि हा निर्णय रद्द करण्याची घोषणा करावी. अन्यथा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करून सरकारला जाग आणेल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नेहमीच सामाजिक समतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे. हा निर्णय केवळ गैरसोयीचा नसून, तो राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक धोरणांच्या विरोधात आहे. त्यामुळे हा निर्णय मागे न घेतल्यास, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्धार करण्यात येत आहे.

एडवोकेट अमोल मातेले

प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

7 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

7 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

9 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago