महाराष्ट्र

मंत्री शंभूराज देसाई आईला मिठी मारून अश्रू अनावर

सातारा: मंत्री शंभूराज देसाई यांनी तब्बल ५५ वर्षांनंतर आपल्या ‘मेघदूत’ बंगल्यात गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. ‘मेघदूत’ बंगला हा मंत्री शंभूराज देसाई यांच्या बालपणाशी निगडित असून, त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हा बंगला मिळवला होता. या ठिकाणीच मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला आणि त्यांनी आयुष्याची पहिली पाच वर्षे येथेच व्यतीत केली होती.

शंभूराज देसाईंचा भावनिक गृहप्रवेश

पंचावन्न वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मंत्री देसाई आपल्या मातोश्रींसह पुन्हा या बंगल्यात परतले. या क्षणी त्यांनी अनुभवलेल्या आठवणींनी त्यांचे आणि संपूर्ण देसाई कुटुंबाचे डोळे पाणावले.

संपूर्ण देसाई कुटुंब भावूक

हा गृहप्रवेश फक्त नवीन घरात पाऊल ठेवण्याचा क्षण नव्हता, तर त्यांच्या बालपणाच्या आठवणी, कौटुंबिक वारसा आणि भावनिक बंध यांचा साक्षीदार ठरला. संपूर्ण देसाई कुटुंब या क्षणी भावूक झाले होते, कारण हा क्षण त्यांच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

2 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

3 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

4 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

4 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

4 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

8 तास ago