सातारा: मंत्री शंभूराज देसाई यांनी तब्बल ५५ वर्षांनंतर आपल्या ‘मेघदूत’ बंगल्यात गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. ‘मेघदूत’ बंगला हा मंत्री शंभूराज देसाई यांच्या बालपणाशी निगडित असून, त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हा बंगला मिळवला होता. या ठिकाणीच मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला आणि त्यांनी आयुष्याची पहिली पाच वर्षे येथेच व्यतीत केली होती.
शंभूराज देसाईंचा भावनिक गृहप्रवेश
पंचावन्न वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मंत्री देसाई आपल्या मातोश्रींसह पुन्हा या बंगल्यात परतले. या क्षणी त्यांनी अनुभवलेल्या आठवणींनी त्यांचे आणि संपूर्ण देसाई कुटुंबाचे डोळे पाणावले.
संपूर्ण देसाई कुटुंब भावूक
हा गृहप्रवेश फक्त नवीन घरात पाऊल ठेवण्याचा क्षण नव्हता, तर त्यांच्या बालपणाच्या आठवणी, कौटुंबिक वारसा आणि भावनिक बंध यांचा साक्षीदार ठरला. संपूर्ण देसाई कुटुंब या क्षणी भावूक झाले होते, कारण हा क्षण त्यांच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…