सातारा: मंत्री शंभूराज देसाई यांनी तब्बल ५५ वर्षांनंतर आपल्या ‘मेघदूत’ बंगल्यात गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. ‘मेघदूत’ बंगला हा मंत्री शंभूराज देसाई यांच्या बालपणाशी निगडित असून, त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हा बंगला मिळवला होता. या ठिकाणीच मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला आणि त्यांनी आयुष्याची पहिली पाच वर्षे येथेच व्यतीत केली होती.
शंभूराज देसाईंचा भावनिक गृहप्रवेश
पंचावन्न वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मंत्री देसाई आपल्या मातोश्रींसह पुन्हा या बंगल्यात परतले. या क्षणी त्यांनी अनुभवलेल्या आठवणींनी त्यांचे आणि संपूर्ण देसाई कुटुंबाचे डोळे पाणावले.
संपूर्ण देसाई कुटुंब भावूक
हा गृहप्रवेश फक्त नवीन घरात पाऊल ठेवण्याचा क्षण नव्हता, तर त्यांच्या बालपणाच्या आठवणी, कौटुंबिक वारसा आणि भावनिक बंध यांचा साक्षीदार ठरला. संपूर्ण देसाई कुटुंब या क्षणी भावूक झाले होते, कारण हा क्षण त्यांच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला.
न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…