महाराष्ट्र

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही अल्पवयीन बालिका मुंबईतील अतिगर्दीच्या परिसरात हरविल्यानंतर, आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील व त्यांच्या पथकाने अवघ्या एका तासात तिचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिले. या उल्लेखनीय कार्याबद्दल आज मंत्रालयात राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

मंत्रालयातील पर्यटन मंत्र्यांच्या दालनात आयोजित कार्यक्रमात चेतना पाटील यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या अतिगर्दीच्या आणि विस्तीर्ण रेल्वे स्थानक परिसरात घडली होती. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी हरविलेल्या बालिकेचा अल्पावधीत शोध घेणे अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, पाटील व त्यांच्या पथकाने दाखविलेली तत्परता, समन्वय आणि अचूक दिशेने तपास यामुळे हे शक्य झाले.

यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “मुंबईत येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेने दाखविलेली तत्परता व संवेदनशीलता अत्यंत प्रशंसनीय आहे. पर्यटकांचा सुरक्षिततेवरील विश्वास अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. चेतना पाटील व त्यांच्या पथकाची कामगिरी संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी आहे.”

हरवलेल्या बालिकेचा तासाभरात शोध घेऊन तिला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देणे ही कर्तव्यदक्षतेची उत्कृष्ट जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, चेतना पाटील यांच्या नावाची विशेष प्रशस्ती व गौरवासाठी गृह विभागाकडे शिफारस करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना सुरक्षित, विश्वासार्ह व सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, पर्यटन स्थळे व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पोलीस यंत्रणा, स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला जात आहे.

अशा सकारात्मक उपक्रमांमुळे पोलीस दलाचे मनोबल वाढण्यासोबतच महाराष्ट्राची ‘सुरक्षित पर्यटन राज्य’ म्हणून ओळख अधिक बळकट होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

4 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

9 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

9 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

9 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

9 तास ago