मुंबई: अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित आमदारांना तात्काळ कडक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता आमदार साजिद खान पठाण यांना एक आंतरराष्ट्रीय कॉल आला. बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने फोन करून १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची उघड धमकी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.धमकी देणाऱ्याने पोलिसांना माहिती दिल्यास काही काळ संरक्षण मिळेल, मात्र सहा महिने किंवा वर्षानंतरही सोडणार नाही, असे उद्दाम वक्तव्य केल्याचा उल्लेख वडेट्टीवार यांनी केला. “धमकीचा ऑडिओ ऐकला तर अंगावर काटा येतो,” असे ते म्हणाले.
लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेचे काय?” संबंधित गँगकडून यापूर्वी गोळीबाराच्या घटना घडल्या असल्याने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार साजिद पठाण यांचा कोणत्याही गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध नसतानाही त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निर्देश दिले की, प्रकरण अत्यंत गंभीर असून शासनाने तात्काळ लक्ष घालून संबंधित आमदारांच्या सुरक्षेबाबत योग्य ती पावले उचलावीत.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…
ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…