मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, “‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग करून काँग्रेस स्वतःच आपल्या इतिहासालाच नाकारत आहे का?” असा सवाल उपस्थित केला.
उमेश पाटील म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात त्यांच्या राजकीय कारकिर्दीत विरोधकांनी याच शब्दप्रयोगाचा वापर केला होता. मात्र इंदिरा गांधी यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्या टीकेला उत्तर दिले. बांग्लादेश मुक्तिसंग्रामातील नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे त्या जागतिक स्तरावरील प्रभावी नेत्या ठरल्या, याची आठवणही त्यांनी करून दिली.
“ज्या शब्दप्रयोगाला काँग्रेसने त्या काळात महिलांचा अवमान मानले होते, त्याच शब्दांचा वापर आज एका महिला लोकप्रतिनिधीविरोधात का केला जात आहे? याचा अर्थ काँग्रेस त्या काळातील टीका योग्य होती, असे मानत आहे का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही राजकीय पक्षाला शोभणारी नाही. लोकशाहीत मतभेद आणि धोरणांवर टीका होऊ शकते, मात्र महिलांबाबत अपमानास्पद भाषा वापरणे अयोग्य असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले.दरम्यान, काँग्रेसने संबंधित शब्दप्रयोग मागे घ्यावा आणि सार्वजनिक जीवनात सन्मानपूर्वक राजकीय संवादाची परंपरा जपावी, अशी मागणीही त्यांनी केली.
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरात बेकायदेशीररीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका व्यक्तीला…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.…
पुणे: विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त…
मुंबई: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव…
मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल सुरू असून प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानी…
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावरून केंद्र…