महाराष्ट्र

ढोलताशांच्या गजरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे प्रदेश कार्यालयात स्वागत

सर्व आमदार गुलाबी फेटे बांधून विधानभवनात दाखल…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडून आलेल्या आणि शपथविधीसाठी एकत्रित जमलेल्या आमदारांचे मुंबईत प्रदेश कार्यालयात गुलाबपुष्प देऊन आणि ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.

प्रदेश कार्यालयात एकत्र येत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ढोलताशांच्या गजरात आमदारांचे प्रदेश कार्यालयाच्यावतीने कार्यालयात प्रवेश करताना आमदारांना गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले.

निवडून आलेल्या आमदारांचा आज शपथविधी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात सकाळी ९ वाजताच दाखल झाले. या सर्वांना गुलाबी फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. शिवाय प्रदेश कार्यालयातून हे सर्व आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनात दाखल झाले. तिथे गेल्यावर सर्व आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभागृहात आमदारकीची शपथ घेतली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

24 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

2 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

3 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

3 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

3 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

3 तास ago