तुमच्या गावात नवीन रेशन दुकान सुरू करण्याकरिता परवान्यासाठी असा करा अर्ज
मुंबई: नवीन राशन धान्य दुकान सुरू करायचे असेल, तर तुम्हाला रास्त भाव दुकानदार परवाना मिळवावा लागतो. हा परवाना मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या गावांमध्ये रास्त भाव दुकान टाकून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकता. चला तर पाहूया रास्त भाव दुकान सुरू करण्यासाठी पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि अर्ज कसा करायचा..
रास्त भाव दुकान सुरू करण्यासाठी पात्रता
अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
अर्जदार हा ज्या भागात शॉप सुरु करण्यासाठी रिक्त पद सूचित केले आहे त्या भागाचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
अर्जदार हा रेशन दुकान संबंधित पुस्तके आणि खात्याची देखभाल करण्यास सक्षम असला पाहिजे.
रिक्त स्थानाची अधिसूचना ज्या जागेवर आहे त्या जागेवर अर्जदारास वैध अधिकार असायला हवा.
राशन दुकान आवारात 15 फुटांचा रस्ता आणि मध्यभागी नागरिक प्रवेश करू शकायला हवे.
प्रस्तावित आवारात 5 मीटर लांबीचा आणि 3 मीटर रुंदी आणि 3 मीटर उंचीवर असणे अनिवार्य आहे.
आवश्यकतेनुसार कागदपत्रे
आधार कार्ड
घर टॅक्स पावती/सातबारा/मालकी पत्र
गटाचे वार्षिक लेखे तपासणी केल्याचा अहवाल
ग्राम सभेचा ठराव दुकान मागणी पत्र
गट स्थापन केल्याचे नोंदणी पत्र
गुन्हा दाखल नसल्या बाबत शपथपत्र
वरील कागद पत्रांमध्ये तुमच्या जिल्हा नुसार बदल असू शकतात. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज करत आहात त्यावेळेस त्या अर्जामध्ये दाखविलेली कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागतील.
अर्ज कसा करावा
सर्वात आधी नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी अर्ज तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्या. तिथे नवीन राशन दुकान परवाना चा अर्ज घ्या.
जर तुम्हाला राशन दुकान परवाना अर्ज ऑनलाइन पद्धतीने मिळवायचा असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याच्या ऑफिसियल वेबसाइट वर भेट देऊन तो अर्ज डाउनलोड करा.
सदर अर्ज बिनचूक भरा, आणि त्यासोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा.
New Ration Shop License चा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा.
लाभार्थ्यांची निवड कशी होईल
1) तुम्ही नवीन राशन दुकान किंवा स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी अर्ज केल्या नंतर परवाना समितीकडे जेवढे अर्ज प्राप्त झाले असतील त्या अर्जाची सर्वप्रथम प्राथमिक तपासणी केली जाते.
2) त्यानंतर अर्जाची छाननी करण्यात येते, तसेच जागेची तापासणी केली जाईल आणि इतर आवश्यक तपासण्या होतील.
3) त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना परवाना देण्यात येत असतो आणि ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकता.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…