महाराष्ट्र

बीडमध्ये बारावी परीक्षेचा मोठा घोटाळा? पेपरवर कॉलेज, परीक्षा दुसरीकडे; ‘बीड पॅटर्न’ची चर्चा

बीड: बीड जिल्ह्यात बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळी येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे हॉलतिकीटावर एक परीक्षा केंद्र तर प्रत्यक्ष परीक्षा मात्र दुसऱ्याच ठिकाणी घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

परळी तालुक्यात एकूण ११ परीक्षा केंद्रांवर सुमारे ५ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. सकाळी ११ वाजता पहिला पेपर सुरू झाला. मात्र, ज्या शाळेला अधिकृत परीक्षा केंद्राचा दर्जा नाही, त्या शारदा माध्यमिक व प्राथमिक विद्यालय, जिरेवाडी येथे यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी त्या शाळेतील नियमित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

‘पेपरवर कॉलेज, प्रत्यक्षात अस्तित्व नाही?’

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय (कला, वाणिज्य, विज्ञान) हे नाथ शिक्षण संस्था, परळी वैजनाथ यांच्या अखत्यारीत असून संस्थाचालक म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव बोर्डवर नमूद असल्याचे सांगितले जाते. मात्र, संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष इमारत, वर्गखोल्या किंवा विद्यार्थी नसल्याचा आरोप होत आहे.

यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत की,प्रत्यक्ष अस्तित्व नसताना कॉलेजला मान्यता कशी मिळाली?

हॉलतिकीटावर नमूद असलेले केंद्र बदलण्याचा निर्णय कोणी घेतला?

शिक्षण विभागाने परीक्षा केंद्राची पाहणी का केली नाही?

अधिकृत परवानगीशिवाय दुसऱ्या शाळेत परीक्षा कशी घेण्यात आली?

शिक्षण विभागाची भूमिका काय?

परळी तालुक्यातील एकही परीक्षा केंद्र ‘संवेदनशील’ नसल्याची माहिती स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे समजते. नियमांनुसार, ज्या केंद्राला परवानगी आहे त्याच ठिकाणी परीक्षा घेणे बंधनकारक आहे. केंद्र बदलण्यास कोणालाही स्वतंत्र परवानगी नसते. तरीही हा बदल कसा झाला, याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे लक्ष

या सर्व प्रकारावर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परीक्षा प्रक्रियेत गोंधळ, नियमभंग आणि संभाव्य गैरव्यवहार यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई होईल का, आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

13 मिनिटे ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

4 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

18 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

24 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

24 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

24 तास ago