महाराष्ट्र

वायुसेनेत अग्निवीरांची नवीन भरती, १२ वी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज…

औरंगाबाद: वायुसेनेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायु भरतीची नोटीफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून या संदर्भात उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. यात तरुण आणि तरुणीही अर्ज करु शकतात.

देशभरात अग्निवीरच्या माध्यमातून नौदलात भरतीची प्रक्रिया सुरू आहे, आता वायुदलातही भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. वायुसानेसाठी लेखी परीक्षा २० मे रोजी होणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी agnipathvayu.cdac.in संकेतस्थळावर भेट द्या.

ज्या उमेदवारांनी 12वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह 50% गुण मिळवले आहेत ते अर्ज करू शकतात. किंवा उमेदवाराकडे तीन वर्षांची अभियांत्रिकी पदविका पदवी असावी. आणि इतर विषयांसाठी, कोणत्याही विषयात 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

✓ पदाचे नाव – अग्निवीर

✓ शैक्षणिक पात्रता – Intermidiate/10+2/ Equivalent (मूळ जाहिरात ✓बघावी.)

✓ वयोमर्यादा – 21 वर्षे

✓ अर्ज पद्धती – ऑनलाईन

✓ अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 मार्च 2023

✓ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2023

✓ अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in

वयोमर्यादा

अग्निवीर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराची जन्मतारीख 26 डिसेंबर 2002 ते 26 जून 2006 दरम्यान असावी.

शारीरीक पात्रता

भरतीसाठी विहित शारीरिक पात्रतेनुसार, पुरुष उमेदवारांची उंची किमान 152.5 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांची उंची 152 सेंटीमीटर असावी. भरती अंतर्गत, उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

13 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

15 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

20 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

20 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

20 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

20 तास ago