महाराष्ट्र

आता… ‘गाव तिथे एसटी’ नव्हे… ‘आदिवासी पाडा तिथे एसटी’; प्रताप सरनाईक

मुंबई: सह्याद्री आणि मेळघाटच्या दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये आता ‘लालपरी’चे चाक फिरणार आहे. राज्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक निर्णय परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला.“आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे सांगितले.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिडी बसेस – विकासाची नवी वाट

राज्य परिवहन महामंडळाकडून ९ मीटर लांबीच्या, ३५ आसनी अशा १०० अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. या बसेसना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे प्रेरणादायी नामकरण करण्यात येणार आहे. अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या घाटरस्त्यांवरून सहज धावू शकतील, अशा या बसेस विशेषतः आदिवासी पाड्यांसाठी नियोजित आहेत.

स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांत एसटी सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून सध्या सुमारे ९३ टक्के लोकसंख्या एसटी सेवेशी जोडलेली आहे. तरीही सह्याद्री व मेळघाट परिसरातील अनेक पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले होते. मोठ्या बसेसना प्रवेश शक्य नसल्यामुळे शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. आता मात्र ही पायपीट थांबणार आहे.

पायवाटांवरून चाकवाटांकडे…

ही केवळ बससेवा नसून सामाजिक समावेशकतेचा महत्त्वाचा सेतू ठरणार आहे. शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यसेवेसाठी धाव घेणाऱ्या मातांसाठी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ बस आशेचा किरण ठरणार आहे.मंत्री सरनाईक म्हणाले, “दुर्गम भागातील आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे.”

विकासाचा नवा संकल्प

‘लालपरी’च्या चाकांमध्ये आता केवळ प्रवास नाही, तर परिवर्तनाची गती दडलेली आहे. डोंगर-दऱ्यांतील शांत पाड्यांवर लवकरच एसटीचा हॉर्न घुमेल आणि त्या आवाजात विकास, समता आणि संधींची नवी पहाट दडलेली असेल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

19 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

20 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

24 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago